संजय राऊतांचा 'हा' संदेश नक्की कुणाला? भाजपला की आघाडीला

Update: 2019-11-19 04:19 GMT

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आपल्या अंदाजात एक शेर ट्विट करत राजकिय चर्चांना सुरुवात करून दिली आहे. "अगर जिंदगी में कुछ पाना हो, तो तरिके बदलो इरादे नहीं" ता आशयाचं हे ट्विट आहे. त्यामुळे यातून राऊत यांचा हा संदेश नेमका कोणासाठी आहे असा प्रश्न पडतोय.

तीन दिवसांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाव न घेता सेनेवर टीका केली होती. आपलं काम सरकार आणणं आहे, कुणाला मुख्यमंत्री करणं नाही, असा टोला गडकरी यांनी शिवसेनेला लगावला होता. राऊत यांचं हे ट्विट याचं प्रत्युत्तर असू शकतं.

भाजपशी काडीमोड झाल्यानंतर शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत येऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे. मात्र सेनेचा मुख्यमंत्री करण्यातल्या अडचणी काही संपायचं नाव घेत नाहीत.

गेल्या ८-१० दिवसांपासून मुंबई आणि दिल्लीत राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू आहे मात्र कोणताच मार्ग निघत नाहीय. संजय राऊत यांच्या या ट्विटमुळे मार्ग कोणताही असला तरी मुख्यमंत्री सेनेचाच होणार याचा पुनरुच्चार शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

 

Similar News