महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यानं सत्ता स्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला आहे. जनतेनं भाजप शिवसेना(BJP) युतीला कौल दिला आहे. मात्र, मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना अडवून बसल्यानं भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
अशातच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती शासन लागू केलं जाईल. असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळं राज्यात राष्ट्रपती शासन लागू केलं जाईल का? त्याचबरोबर सत्ता स्थापने संदर्भात शिवसेनेला(shivsena) कॉंग्रेस राष्ट्रवादी पाठींबा देतील का? या प्रश्नांनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे.
नक्की काय घडतंय राजकीय पटलावर पाहा? मॅक्समहाराष्ट्र्चे कार्यकारी संपादक विलास आठवले यांचे विश्लेषण