कोळी बांधवाना तुर्तास तरी कुठेच हलवले जाणार नाही असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांच्या महापालिका आयुक्तांशी झालेल्या भेटीतून निष्पन्न झाले आहे. इमारतीची डागडुजी होईपर्यंत कोळी बांधवाना जवळच्याच परिसरात जागा उपलब्ध करून दिली जाईल. डागडुजी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्यांची जागा दिली जाणार असे राज ठाकरे यांनी पालिका आयुक्तांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. महापालिकेने नोटीस जाहीर केल्यानंतर कोळी महिलांनी कृष्णकुंज वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांनी कोळी महिलांना पूर्ण पाठींबा देऊन आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते.