देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. काही दिवासतच देशातील ७० जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दीडशे टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे ही लाट रोखण्यासाठी तातडीची आणि ठोस पावलं उचलण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी बुधवारी संवाद साधला.