ठाकरे सरकार ५ वर्ष टीकणार का? प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विधान

Update: 2021-12-27 13:08 GMT

राज्यात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होईल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यावर शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. पण आता प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष टिकेल का यावर मोठे वक्तव्य केले आहे. तसेच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सरकारने कायद्यात बदल केला आहे. पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या निर्णयाला आक्षेप घेतल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कायद्यातील बदलाबाबत लवकर निर्णय घ्यावा लागेल, ते रेंगाळत ठेवता येणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. ते दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

Tags:    

Similar News