औरंगाबाद जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

Update: 2021-03-21 14:03 GMT

औरंगाबाद: जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

गंगापूर,फुलंब्री तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडत आहे.तर इतर तालुक्यात ढगाळ वातावरण असून, जोरदार वारा सुरू आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून, काढणीस आलेल्या गहू, हरभरा, मका, करडई आदी पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

Full View


Similar News