दिल्लीतील चिमुरडीवर बलात्कार अन् हत्या; ठाण्यातील वाल्मिकी समाजाचा कँडल मार्च

दिल्लीतील चिमुरडीवर झालेल्या बलात्कार अन् हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करत ठाण्यात कँडल मार्च काढण्यात आला

Update: 2021-08-18 09:22 GMT

ठाणे : दिल्ली येथे एका चिमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असल्याच्या निषेधार्थ रिपाई एकतावादीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण आणि वाल्मिकी समाजाचे नेते दशरथ आठवाले यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातकँडल मार्च काढण्यात आला.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला वाल्मिकी समाजाच्या मुलीचा संशयास्पदद मृत्यू झाला होता. या मुलीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने वागळे टीएमटी आगार येथून कँडल मार्च काढून पीडित चिमुरडीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या घटनेतील दोषींवर तातडीने कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाल्मिकी समाजाकडून करण्यात आली. आरोपींवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वाल्मिकी समाजाकडून देण्यात आला आहे.

यावेळी ,राकेश चौहान ,दशरथ आठवाले , गोपाळ विश्वकर्मा आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar News