वर्षभरात सर्व टोलनाके बंद होणार- नितीन गडकरी

Update: 2021-03-18 09:27 GMT

सध्या टोलनाक्यांवरुन कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात देशातील सर्व टोलनाके हटवले जातील, अशी घोषणा गडकरी यांनी केली आहे. पण टोलवसुली मात्र थांबणार नाहीये, जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून टोलवसुली केली जाणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. नवीन गाड्यांमध्ये ही प्रणाली लावली जाणार आहे तर जुन्या गाड्यांमध्ये सरकार ही जीपीएस प्रणाली लावणार आहे, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

Tags:    

Similar News