लोकांच्या गळी उतरणे एवढे सोपे नाही. मनोहरच्या प्रत्येक बोलण्यामागे, त्याच्या कृतीमागे(act) एक वास्तवता असे. त्याचा लढा हा कोणा एक समाजाविरुद्ध नसून तो त्या समाजव्यवस्थेवर आधारित होता. मनोहर समाजाला कितपत कळला, त्याचं कार्य लोकांना कितपत भावलं, याबद्दल शंका आहे.महाराष्ट्राच्या मुक्तिवादी चळवळीचा कार्यकर्ता, वैचारिक समाजाला संशोधक म्हणून, साहित्य व संस्कृती क्षेत्रातला कथाकार म्हणून, एक संघटक अशा वेगवेगळ्या भूमिकेतील मनोहर कदम सर्वश्रृत आहेत. आपल्या या वैचारिक, संशोधक दृष्टीने मनोहर कदमांनी समाजासाठी (social)उद्बोधक कार्यच केले. मनोहर कदम यांच्या पत्नी पत्रकार प्रतिमा जोशी यांनी मनोहर कदमांचे अनेक पैलू MaxMaharashtra वर उघड केले आहे.