आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे त्यांच्या बद्दल कृतज्ञता बाळगणे ती योग्य प्रकारे व्यक्त करणे ही अतिशय सुंदर कल्पना आहे. हि ज्याकुणी पूर्वजांनी मांडली ते खूप सज्जन आणि संवेनशील असतील. मात्र आता त्या रुढीच्या निमित्ताने केली जाणारी कर्म कांडे, व्रत ही मात्र यातून एका वर्गाचा फायदा होत असल्याने ती गेली शेकडो वर्ष तशीच सुरू आहे. त्यावर आता प्रश्न उठू लागले असून याची चिकित्सा झाली पाहिजे किंबहुना श्रद्धा , पितृपंधरवडा यावर प्रश्न उभे राहू लागले आहे. यासदर्भात डॉ ठकसेन गोराने यांच्या सोबत प्रतिनिधी किरण सोनवणेंनी साधलेला हा संवाद...