बीड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून अचानक जनावरे मरत असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. या प्रकाराची प्रशासनाला माहिती मिळून देखील एकही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली नाही. माञ, काही संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद उपाध्यक्षाच्या दालनात घुसून तोडफोड करून जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना चोप दिल्याने. लागलीच जिल्हा परिषदेची यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलीये. पाहुयात दुष्काळात पिचलेल्या शेतकऱ्यांची अडवणूक कसं करतय प्रशासन..