मराठवाड्यामधील लातूर जिल्ह्यात विखुरका या तालुक्यात भीषण दुष्काळ पडला असून फडणवीस सरकारचे दुर्लक्ष असल्याचे शेतकऱ्यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं आहे. जिल्ह्यात दुष्काळ पडला असूनही सरकारने या ठिकाणी दुष्काळ जाहीर केला नाही. पाण्यासाठी वण-वण हिंडावं लागत असून ऊस जळून खाक झाला आहे. दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी परवड होतं आहे. नेमकं शेतकऱ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय... आणि सरकारकडून त्यांच्या काय मागण्या आहेत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी... पाहा शेतकऱ्यांच्या व्यथा... त्यांच्या तोंडून