फडणवीस सरकार जाहिरातबाजीत अडकले असून, खोटं बोलायलाही ५६ इंचाची छाती लागते आणि ती फडणवीस सरकारकडे आहे अशी सणसणीत टीका शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे यांनी केलीय. फडणवीस सरकारला तीन वर्ष झाल्यानंतर विविध माध्यमांमधून सरकारने जाहिराती दिल्या आहेत. यावर चंद्रकांत वानखेडे यांनी मॅक्स महाराष्ट्राला आपली प्रतिक्रिया देताना सरकारवर टाका केली आहे.