काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शेतकरी प्रेम म्हणजे त्यांची ड्रामेबाजी आहे. सत्तेत असताना त्यांनी स्वामिनाथन आयोग का लागू केला नाही? असा सवाल शेतकरी नेते आणि सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. फडणवीस सरकारही शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत उदासीन असून, कर्जमाफीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचंही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रघुनाथदादा पाटील सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.