परतीच्या पावसानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. वर्ष भराची कमाई काही दिवसात घालवली असल्यामुळे आणि डोक्यावर झालेल्या कर्जामुळे मालेगाव तालुक्यातील रोझे गावतील शेतकरी भास्कर रामा घुगे यांनी आत्महत्या केलीय. येणारं उत्पन्नापासुन महाराष्ट्र बँकेचे कर्ज फेडायचं होतं मुलीचं लग्न करायचयं, नातलगाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची. पंरतु उत्पन्न हातातुन गेल्यामुळे या शेतकऱ्यानं आपल जीवन संपवल. पहा हा व्हिडीओ.....