अबब...शेतकऱ्याला मिळाली केवढी नुकसान भरपाई?

Update: 2020-01-15 02:30 GMT

आधी दुष्काळ, नंतर अतिवृष्टी आणि आता अवकाळी पाऊस अशा अस्मानी संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर सुल्तानी संकटही ओढवलं आहे. पाच एकर मका पिकाची नुकसान भरपाई फक्त २५ रुपयेच दिल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडलाय.

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील बाळासाहेब पाटील या शेतकऱ्याला पीक विमा कंपनीनं अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून २५ रुपये दिलेत. अतिवृष्टीमुळे पाटील यांच्या शेतातील ७० टक्के पिकांचे नुकसान झाले. तसेच संपूर्ण चाऱ्याचे १०० टक्के नुकसान झाले. पण विमा कंपनीने फक्त २५ रुपये बँक खात्यावर पाठवत क्रूर चेष्टा केली आहे. तसा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आलाय.

हा विमा काढण्यासाठी त्यांना एक हजार सहा रूपांचा विमा हप्ता व कळवण येथे ऑनलाईन कागदपत्रे पाठवण्यासाठी २५० रुपये खर्च आला आहे. असे असतांनाही पिकाची नुकसान भरपाई २५ रुपये पाठवून विमा कंपनीने शेतकऱ्यांची एकप्रकारे थट्टाच केली.

हे ही वाचा

नैसर्गिक नुकसानीपासून शेतमालाचा संभाव्य धोका ल७त घेत केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना विमा काढण्याचं आवाहन केलं. नाशिक जिल्हातल्या कळवण तालुक्यातील पाळे (खुर्द) गावात राहणाऱ्या बाळासाहेब पाटील यांनी जुलै२०१९ रोजी त्यांच्या पाच एकरवरील मक्यासाठी विमा काढला. त्यासाठी त्यांनी एक हजार ६ रुपये भरले. मात्र अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे बाळासाहेब पाटील यांच्या शेतीचं नुकसान झालं. त्यामध्ये ७० टक्के पिक उध्वस्त झालं. तर १०० टक्के चारा नष्ट झाला.

त्यांनी रितसर विमा कंपनीकडे तक्रार केली. मात्र विमा कंपनीचा प्रतिनीधी शेताकडे फिरकलाही असं त्यांचं म्हणणं आहे. अखेर त्यांना विमा मिळाला, मात्र विम्याची रक्कम होती २५ रुपये. विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेनं पीक विम्याच्या मुद्यावर सत्तेत असूनही रस्त्यावर उतरुन विरोध केला होता. त्यामुळे आता खुद्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानं हा प्रश्न सुटेल आणि पीक विमा कंपन्यांची मुजोरी कमी होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Similar News