कायम दुष्काळाच्या गर्तेत अडकलेल्या मराठवाड्याला यंदा अतिवृष्टीने जोरदार फटका दिलेला आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतांमध्ये कमरे एवढे पाणी साचलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेलेला आहे. परिस्थिती एवढी भयंकर झालेली असतानाही या भागांमध्ये असूनही शासकीय यंत्रणा पंचनामे करण्यासाठी पोहोचलेली नाहीये. इथे परिस्थिती काय आहे याचा थेट शेतामध्ये जाऊन आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी...