महाविकास आघाडी च्या सरकार ने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करुन, शेतकऱ्यांचं 2 लाखापर्य़ंत कर्ज सरकारने भरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद ही केली. त्यानंतर ठाकरे सरकार ने आता एक पाऊल पुढे जात ज्या शेतकऱ्यांनी अधिकृत सावकरांकडून कर्ज घेतले आहे. असे कर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.
सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार मराठवाडा आणि विर्दभातील शेतक-यांची परवानधारक सावकाराकडून घेतलेली कर्ज माफ होणार असुन ही रक्कम सरकार आपल्या तिजोरीतुन सावकाराला अदा करणार आहे.
सावकाराने आपल्या परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेल्या कर्जाची जबाबदारी या अगोदर सरकार घेत नसे, मात्र आता ही अट देखील शिथील करून सावकाराने आपल्या क्षेत्राच्या बाहेर ज्या काही शेतकऱ्यांना कर्जवाटप केले आहे. त्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज आता सरकार भरणार आहे. यासाठी शासनाने 65 कोटींची तरतूद केली आहे.