आज मला अराजकीय बाबींवर बोलावंस वाटतयं. मी राजकरणावर बोलू इच्छित नाही. राजकीय बाबींचा मला कंटाळा आला आहे. त्यामुळे थोडसं अराजकीय बाबींवर बोललं बरं. म्हणून असं काही केलं जावं. ज्यात राजकारण येणार ऩाही. निवडणूकांचा कालावधी खूप मोठा झाला आहे. पत्रकार देखील थकले आहेत. काही पत्रकारांनी बाहेरुन कानोसा घेतला. मात्र, मोदी-मोदींच्या घोषणा ऐकायला आल्या नाहीत. संपादकानी हिशोब मागितला तर, पत्रकार खाली माना घालून उभा राहिले. त्यानंतर दुसरे पत्रकार पाठवले. त्याने जनतेचा कौल समजून घेतला. तेव्हा लक्षात आले की, २०१९ ला लाटेच्या जागेवर अंडरकरन्ट आला आहे. वारे वरुन वाहत असून अंडरकरन्ट जमिनीवरुन जात आहे. तेव्हा विचार केला की, निवडणूकांच्या काळातच राजकारण होत नसेल तर राजकारणापासून थोडसं दूर व्हायला हवं. थोडसं वेगळे काहीतरी करायला हवं. तर आंबे खाऊया. पण आंबे कसे खातात ? दशहरी आणि चौसा हे आंबे तर चोखूनच खावे लागतात. मात्र, मालदा खाण्यासाठी चमचाच लागेल. जर काहीच कळत नसेल तर सफेदाच खा… मॅगो शेकही चालेल. पण मला सफेदा आवडत नसला तरी काय करणार आंबा आहे. खराब लागू शकतो.
राजाच्या समोर त्याला कधीच असं म्हणू नये की तो मला आवडत नाही. तो म्हणजे सफेदा आंबा. मॅंगो शेकमध्ये काय कळतं आतमध्ये कोणत्या आंब्याचा रस आहे. दूध साखर आणि चेरीची चव रेंगाळत राहते. जर जास्त प्रमाणात चेरी टाकल्या तर मॅंगो शेकची चव जाते. अशा वेळेस तुम्ही मॅगो लस्सी घेऊ शकता. आंब्याला तुमच्या समोर चौहोबाजूंनी दाखवल्यानंतर तुमचा विश्वास बसू शकतो की हा आंबाच आहे. त्यानंतर सालं काढून कापताच तोंडाला पाणी येतं. मग, काय ? मिक्सरमध्ये दही टाकलं, आंबा टाकला आणि गरका मारला तर लस्सी तयार. हो, पण ती पिण्याची एक पद्धत आहे. आता तुम्ही खाण्याच्या पद्धतीचच बघा. कसं ही खा पण या लोकांसारखं खाऊ नका. पण मजा तर असंच खाण्यात येते. असं वाटतं की खूप दिवसांनी आंबा खायला मिळाला. पिळूनच काढला बिचाऱ्या आंब्याला. वाटतच नाही की, आंबा माणूस खातोय, वाटतंय मिक्सरच खातोय. ऋतू पण मध्ये निघून जातात आणि इतक्या काळानंतर खायला मिळालाय म्हणजे खायची इच्छा होणारच ना?
काय मग, तुम्हाला बरं वाटतंय ना ? की आपण अराजकीय गोष्टींवर चर्चा करतोय. यामुळे कोणी नाराज पण होत नाही. म्हणतात ना ‘आम का आम दाम के दाम’ तुम्हाला वाटत असेल तर की मी असं का बोलतो आहे. अरे देशाचे पंतप्रधान जर अराजकीय बोलत असतील तर आमचं काय ? पंतप्रधानांना लोक म्हणाले तुम्ही कुमारला मुलाखत द्या त्यांनी अक्षय कुमारला दिली. त्यामुळेच निवडणूकीच्या वातावरणात आंब्यावर चर्चा करता येते. एकदा अकबर इलाहबादी यांनी लाहोरला आंब्याचे पार्सल पाठवले. इकबालने ते सुखरुप मिळाल्याचे कळवताच इलाहाबादी यांनी आश्चर्य व्यक्त करत एक शेर लिहिला…
‘’असर ये तेरे अन्फ़ास-ए-मसीहाई का है
‘अकबर’ इलाहाबाद से लंगड़ा चला लाहौर तक पहुंचा’’