
रविकुमार सुभाषराव
गेली १४ - १५ वर्षे सातत्याने फेसबुकचा वापर करून सामाजिक, राजकीय आणि चालू घडामोडींवर भाष्य करतात. हे करत असताना कधीही अभिव्यक्तीची संविधानिक आणि समाजमान्य चौकट ओलांडली नाही. गाव, गावातील बारा बलुतेदार,गावातील राजकारण तसेच खाचाकोचा या हॅशटॅगखाली महाराष्ट्र आणि देशातील राजकारणातील अंतर्गत प्रवाह मांडतात. सामाजिक भूमिका घेताना पीडित आणि शोषित लोकांना न्याय मिळेल तसेच सरकारी यंत्रणा, RTI आणि Grievance Redressal Mechanisms यांचा प्रभावी वापर करून अशा गोष्टींचा वापर इतरांनी कसा करावा यासंबंधी अनेकदा लिखाण केलेलं आहे. रोजच्या जगण्यातील विरोधाभास व्यंगात्मकरित्या शब्दांतून मांडण्यासाठी फेसबुक वापरतात आणि सोशल सोबत्यांनाही ते विरोधाभास ठळक दिसावेत यासाठी प्रयत्नशील असतात. बाकी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा (UPSC) अभ्यास करून मुलाखतीपर्यंत मजल मारल्याने संतुलीत मते मांडून आणि एखाद्या प्रश्नावर व्यावहारिक तोडगा कसा निघाला पाहिजे यासाठी आग्रही असतात.
Sorry, but no results found for your request. Please try different category or search.
⌂ Back to Homepage

