Home > Top News > Political visits to religious places : महाराष्ट्रातले नेते कामाख्याला का गेले ?

Political visits to religious places : महाराष्ट्रातले नेते कामाख्याला का गेले ?

महाराष्ट्रातील नेते कामाख्येला का जातात? श्रद्धा की सत्ता मिळवण्याचा शॉर्टकट? वाचा डॉ. सुभाष देसाई यांचा लेख

Political visits to religious places : महाराष्ट्रातले नेते कामाख्याला का गेले ?
X

political visits to religious places भारतामध्ये अनेक धार्मिक पंथ आहेत त्यात वारकरी संप्रदायापासून प्रत्येक साधू संतांचे वेगवेगळे संप्रदाय आहेत. प्राचीन काळापासून म्हणजे थेट वेदापासून अथर्ववेदामध्ये यातू विद्या आहे म्हणजे तो हात चलाखी जादू, लोकांची नजर बंदी अशासाठी वापरला जातो म्हणजे काळी जादू आणि शुद्धविद्या असे दोन प्रकार आहेत जेव्हा लोकांना फारसे कष्ट न घेता शॉर्टकटने यश मिळवायचे असते त्यावेळी ते काळ्या जादूचा वापर करतात. काही लोक तिलाच अघोरी विद्याही म्हणतात गुढ विद्येमध्ये अनेक प्रयोग केले जातात आणि हे सार्वत्रिक आहे. ग्रीसमध्ये मी पाहिलं की डेल्फीच्या देवाला नवस बोलला जातो आफ्रिकेमध्ये मी पाहिलं काळ्याजादूवर विश्वास आहे भारतात सर्वत्र हे दिसतं आणि त्यातल्या त्यात आसाम मधल्या गो हत्ती येथील कामाख्या पीठ हे तंत्र पीठ Kamakhya temple rituals म्हणून भारतात आणि जगात प्रसिद्ध आहे.

दुर्गेच्या अनेक स्वरूपांची मंदिरे याठिकाणी आहेत मी तेथे पाहिले की भुवनेश्वरी, त्रिपुरा सुंदरी, बगलामुखी, महाकाली, छिन्नमस्था अशा विविध देवतांची मंदिरे आहेत, अनेकांचा वापर शत्रू उच्चाटनासाठी केला जातो त्यासाठी काहीजण काली कवच सिद्ध करतात तर कोणी इतर उपासना करतात मात्र या तंत्र पिठाला बळी हा दिला जातो. जर गुहाटीमध्ये तुम्ही पहाल तर अनेक पारव्यांच्या पासून मोठ्या जनावरापर्यंत, रेड्यापर्यंत बळी दिले जातात. रक्ताचे पाठ वाहत असतात आणि ही सारे का करायचे? तर तुम्हाला यश मिळावे म्हणून एखाद्याला उपमुख्यमंत्री पासून मुख्यमंत्री व्हायचे असेल तरी तो येथे येईल आणि ग्रामपंचायत सरपंचाला आमदार व्हायचे असेल तरी तो येथे नवस बोलेल. दुर्गा सप्तशती हा या संप्रदायाचा मंत्र असतो तेथे दुर्गा चंडमुंडपासून अनेक राक्षसांचा वध करते त्यासाठी देवी महिषासुरूपातील राक्षसाचा बळी देते. ही काली पूजा अनेक जण स्वतःचे रक्त काढून पूजा करून देतात याची विकृत परिणिती मानवी बळी देण्यापर्यंत जाते.

faith or power game महाराष्ट्रातील अनेक आमदार, मंत्री वरचेवर या तंत्र पिठाला भेट देत होते हे सत्य आहे त्यामुळे रक्ताने पूजा करणे प्राणी व मानव बळी देणे अशा गोष्टी शक्य आहेत. या कामाख्या देवी बद्दल अशी पुराण कथा आहे की, हरिद्वारला दक्ष राजाने जो यज्ञ केला त्याला जावई शिवाला बोलावले नाही मात्र दक्ष कन्या पार्वती त्या ठिकाणी आली पण तिला आपल्या नवऱ्याचा केलेला अपमान सहन न झाल्याने तिने यज्ञामध्ये उडी घेतली आणि प्राण सोडले त्या वेळेला शिव येऊन यज्ञ उद्ध्वस्त केले आणि पार्वतीचे शरीर घेऊन ते साऱ्या भारतभर फिरले. त्या देवीचा कर्ण जेथे पडला ते कर्नाटक झाले. हात पडला ते करवीर पीठ झाले आणि योनी जेथे पडली ते कामाख्यापीठ झाले या ठिकाणी देवीला मासिक धर्म होतो असे मानले जाते आणि त्यामुळे योनी पूजा हा महत्त्वाचा विधी मांडला जातो भोंदू बाबांनी या गोष्टींचा चपखल उपयोग करून अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. टाळी एका हाताने वाजत नाही त्यामुळे महिलांचाही त्याला मिळालेला लैंगिक प्रतिसाद हा या साऱ्या प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे.

मात्र या साऱ्या माहितीचा कळीचा नारद हा नामा निराळा आहे सारी सुत्रै आपल्या हातात घेऊन राजकीय पटलावरून काही ना कायमचे दूर करायचे या ध्येयाने आत्ताच ही धर्माच्या शरीराला झालेली कॅन्सरची गाठ साऱ्यांना दिसू लागली हे सारे सुडाचे महाभारत आहे आणि जर याला तुम्ही हिंदू धर्म म्हणत असाल आणि असे हिंदू राष्ट्र तुम्हाला हवे असेल तर भारतीय संस्कृती प्रसातळाला गेली असेच मला वाटते. धर्म ही अफूची गोळी आहे असे मार्क्स म्हटला तेच खरे वाटू लागते.


(या लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तिक आहेत. त्याच्याशी मॅक्स महाराष्ट्र सहमतच असेल असे नाही.)

Updated : 28 March 2026 1:32 PM IST
author-thhumb

डॉ. सुभाष के देसाई

वयाच्या 19व्या वर्षापासून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार, लेखक, पर्यटक, गिर्यारोहक, संशोधक, धर्म आणि विज्ञान विषयातील तज्ञ अशा विविध भूमिकेतून कार्यरत असणारे डॉक्टर सुभाष के देसाई हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. गुलमोहर आर्ट गॅलरी येथे संस्थापक आहेत दैनिक सिंहवाणीचे संस्थापक संपादक, पीटीआय, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, सकाळ, पुढारी अशा विविध वृत्तपत्रात लिखाण केले अकॅडमी ऑफ रिलीज युनिटी या विविध धर्मांना एकत्र आणणाऱ्या संस्थेचे ते संस्थापक आहेत. शिवाजी विद्यापीठात वृत्तपत्र विद्या विभागात त्यांनी 25 वर्षे योगदान केलेले आहे. जवळजवळ 30 देशांमध्ये, साऱ्या हिमालयात त्यांनी भ्रमंती केली आहे. अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले जगातील आणि देशातील अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींशी त्यांचा संपर्क आला याशिवाय स्वामी विवेकानंद या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर आजन्म प्रभाव राहिला ते अविवाहित असून बहुजन हिताय बहुजन सुखाय हे त्यांनी जीवनाचे ध्येय ठेवले.


Next Story
Share it
Top