Home > Top News > Book Review of The Hidden Life of Trees : झाडे विचार करतात का ?

Book Review of The Hidden Life of Trees : झाडे विचार करतात का ?

झाडे लावा झाडे जगवा असं का म्हटलं जातं? झाडे काय विचार करतात? The Hidden Life of Trees या पुस्तकाचा रिव्ह्यू सांगताहेत डॉ. सुभाष देसाई

Book Review of The Hidden Life of Trees : झाडे विचार करतात का ?
X

The Hidden Life of Trees झाडांना सामूहिक जीवन असतं का किंवा उंच उंच झाडांना पाणी कसं पोहोचतं असे अनेक प्रश्न तुम्हाला असतील आता या वेळेला द हिडंन लाईफ ऑफ ट्रीज नावाच एक सुंदर पुस्तक पीटर वोह्ललेबेन Peter Wohlleben यांनी अनेक प्रयोगानंतर, संशोधनानंतर लिहिले आहे. इटलीच्या ट्युरीन विद्यापीठाचे मासिमो माफी यांच्या मते झाडाकडे आपल्या प्रजातीची मूळ अचूक ओळखण्याची क्षमता असते आपल्या आणि इतर प्रजातीच्या मुळा मधला फरक ही त्यांना ओळखता येतो. आपले खाद्य आपल्या स्वजातीयशी आणि काही वेळा स्पर्धकाशीही वाटून खाण्याचं त्या औदार्य दाखवतात. अशा प्रकारच्या सहजीवनाचे फायदे आहेत.

एक झाड म्हणजे वन परिसंस्था नव्हे. स्थानिक हवामान नियंत्रणाची क्षमता एका झाडात नसते. वादळी वारे आणि प्रतिकूल हवामानाला एकट्याने तोंड देणं सोपं नसतं पण अनेक झाडं असलेल्या परिसराची परिसंस्था बनते. अशा प्रकारच्या समूहात थंडी, उष्णता नियंत्रणाची थोडी क्षमता असते. एकमेकांच्या साह्याने पाण्याचा अधिक साठा होऊ शकतो व हवेतील आर्द्रता वाढवता येते. अशा अनुकूल परिस्थिती झाडे अनेक वर्ष जगू शकतात पण यासाठी तिथल्या सर्व झाडांना सहकार्यानेच जगावं लागतं. प्रत्येक झाड जर स्वतःचा फायदा बघू लागलो तर सर्वांना दीर्घायु लाभणे शक्य होणार नाही आणि झाड तोडण्याचे प्रमाण वाढले की तिथे जंगलातील अच्छादन कमी होईल. अशा परिस्थितीत वादळी वाऱे शिरतात आणि उन्हाची झळ जमिनीला लागून मातीची धूप होते.

प्रत्येक झाडालाच संकटाला तोंड द्यावे लागते. केश आकर्षण, ट्रान्सपिरेशन आणि द्रवाहाभिसरण या मार्गे पाणी सरकत सरकत मुळापासून शेंड्यापर्यंत जाते पण पाणी वाहतुकीच्या प्रक्रियेचं मानवाचं ज्ञान अजूनही अचूक म्हणता येत नाही. कितीतरी प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नाहीत.

मातीच्या आतल्या बाजूला झाडांची साल असो कीटक, फंगस यांचे अतूट नातं असतं. पूर्वीच्या व्यावसायिक जंगलातून आता कीटकांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढू लागतो त्यामुळे अनेक झाडं मरून जातात आणि त्याशिवाय विविध रस्त्यांच्या निर्मितीसाठी, रेल्वे ट्रॅक साठी करोडो झाडांची कत्तल होते ही पर्यावरण हानी शेवटी मानवी जीवनाला घातक ठरणार आहे . झाडे लावा, झाडे जगवा

डॉ. सुभाष के देसाई

Updated : 17 Feb 2026 8:34 AM IST
author-thhumb

डॉ. सुभाष के देसाई

वयाच्या 19व्या वर्षापासून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार, लेखक, पर्यटक, गिर्यारोहक, संशोधक, धर्म आणि विज्ञान विषयातील तज्ञ अशा विविध भूमिकेतून कार्यरत असणारे डॉक्टर सुभाष के देसाई हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. गुलमोहर आर्ट गॅलरी येथे संस्थापक आहेत दैनिक सिंहवाणीचे संस्थापक संपादक, पीटीआय, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, सकाळ, पुढारी अशा विविध वृत्तपत्रात लिखाण केले अकॅडमी ऑफ रिलीज युनिटी या विविध धर्मांना एकत्र आणणाऱ्या संस्थेचे ते संस्थापक आहेत. शिवाजी विद्यापीठात वृत्तपत्र विद्या विभागात त्यांनी 25 वर्षे योगदान केलेले आहे. जवळजवळ 30 देशांमध्ये, साऱ्या हिमालयात त्यांनी भ्रमंती केली आहे. अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले जगातील आणि देशातील अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींशी त्यांचा संपर्क आला याशिवाय स्वामी विवेकानंद या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर आजन्म प्रभाव राहिला ते अविवाहित असून बहुजन हिताय बहुजन सुखाय हे त्यांनी जीवनाचे ध्येय ठेवले.


Next Story
Share it
Top