Suspicious deaths in India : संशयांच्या सावलीतली मृत्यूंची मालिका : हा केवळ योगायोग की विचारसरणीचा नकाशा?
X
भारताची लोकशाही जगात सर्वात मोठी मानली जाते. पण गेल्या काही वर्षांमध्ये असे मृत्यू झाले, की प्रत्येक वेळी समाजाच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला. हा अपघात आहे की आखलेला डाव? विचारवंत, पत्रकार, न्यायाधीश, तपास अधिकारी, राजकारणी विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या संशयास्पद मृत्यूंनी लोकशाहीच्या आरोग्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले. या घटनांचा क्रमवार आढावा घेऊ.
१) माधवराव सिंधिया यांचे निधन (२००१)
३० सप्टेंबर २००१ रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि जनतेत लोकप्रिय असलेले माधवराव सिंधिया यांचा उत्तर प्रदेशातील मैनपुरीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला. ते एका चार्टर्ड विमानाने प्रचारसभेला जात असताना विमान कोसळले आणि त्यांच्यासह इतर सहकारीही दगावले. अधिकृत अहवालानुसार हा तांत्रिक बिघाडामुळे झालेला अपघात मानला गेला. मात्र देशाच्या राजकारणात मोठा प्रभाव असलेल्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या या नेत्याचा अचानक अंत झाल्याने अनेकांनी शंका व हळहळ व्यक्त केली. सिंधिया हे काँग्रेसमधील उदारमतवादी, सर्वमान्य आणि भविष्यातील राष्ट्रीय नेतृत्व म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूने केवळ एक नेता गमावला नाही, तर भारतीय राजकारणाने एक संतुलित, संवादप्रिय आणि प्रगल्भ पर्यायही हरवला, अशी भावना आजही व्यक्त केली जाते.
२) डॉ. नरेंद्र दाभोळकर (२०१३)
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धेविरोधात कठोर भूमिका पुण्यात सकाळच्या फेरफटक्यात गोळ्या झाडून हत्या झाली. तपासात उजव्या अतिरेकी संघटनांशी संबंध असल्याचे आरोप झाले.
प्रश्न: विचार मांडल्याबद्दल हत्या?
३) गोविंद पानसरे (२०१५)
समाजवादी विचारवंत, ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकामुळे लोकप्रिय होते. सांप्रदायिकतेवर कठोर टीका करत असायचे, त्यांच्यावर कोल्हापुरात गोळीबार झाला होता. काही दिवसांनी निधन झालं.
➡ पॅटर्न: दाभोळकरप्रमाणेच
४) एम.एम. कलबुर्गी (२०१५)
कन्नड विद्वान, मूर्तिपूजा व अंधश्रद्धेविरोधात भूमिका घेणारे होते. त्यांची घरी जाऊन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
➡ तीच शैली, तीच लक्ष्यवृत्ती
५) गौरी लंकेश (२०१७)
निर्भीड पत्रकार म्हणून ओळखल्या जात होत्या. हिंदुत्ववादी राजकारणावर कठोर टीका करायच्या. त्यांची घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय
➡ विचार मांडणारे पत्रकार लक्ष्यावर
६) हेमंत करकरे (२००८, 26/११ अतिरेकी हल्ल्यात शहीद)
एटीएस प्रमुख होते. मालेगाव स्फोट प्रकरणात अतिरेकी हिंदुत्ववादी गटांचा तपास करत होते.
26/11 मध्ये मृत्यू झाला. अनेकांनी तपासाच्या दिशेमुळे शंका व्यक्त केल्या
➡ अधिकृत मृत्यू दहशतवादी हल्ल्यात, पण प्रश्न कायम आहे.
७) न्यायाधीश बी.एच. लोया (२०१४)
सोहराबुद्दीन प्रकरणाचा खटला, अचानक मृत्यू (हृदयविकार)
कुटुंबीयांनी परिस्थितीवर शंका व्यक्त केली
➡ न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह
८) जी.एम.सी. बालयोगी (२००२)
लोकसभा अध्यक्ष
हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
अधिकृतरीत्या अपघात, पण राजकीय पातळीवर चर्चा
९) गोपीनाथ मुंडे (२०१४)
केंद्रीय मंत्री, साध्या कार अपघातात मृत्यू, इतक्या साध्या धडकेत मृत्यू कसा? अशी चर्चा होती.
अजित पवार घातपात?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भाजपच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याच्या फाईल माझ्याकडे आहेत असे त्यांनी जाहीर केले होते मूळ शरद पवार गटाशी मिलन होण्याची शक्यता होती आणि त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या सत्तेला हादरा बसण्याची शक्यता होती त्या अगोदरच विमान अपघात घडतो मात्र त्यांच्या संदर्भात विविध राजकीय अफवा, दबाव, ईडी चौकशा, सत्तेतील घडामोडी
हे “राजकीय अस्थिरतेचे” उदाहरण आहे, मृत्यूचे नव्हे या साऱ्यात दिसणारे साम्य काही ठळक गोष्टी लक्षात येतात.
विवेकवादी/प्रगतिशील विचारवंत लक्ष्य सत्तेविरोधी किंवा संघटित अतिरेकी विचारांना आव्हान देणारे लोक तपास अधिकारी/न्यायाधीश जे संवेदनशील प्रकरणे हाताळत होते
मृत्यूंची पद्धत
गोळीबार, अपघात, अचानक हृदयविकार हे सर्व “योगायोग” म्हणून मान्य करणे कठीण वाटते.
मूळ प्रश्न : विचारसरणीचा नकाशा आहे का? थेट पुरावा न्यायालयात सिद्ध होणे वेगळे,पण सामाजिक विश्लेषण वेगळे. जेव्हा विवेकवाद्यांना गोळ्या लागतात, पत्रकार मारले जातात, तपास अधिकारी संशयास्पदरीत्या मरतात, न्यायाधीश अचानक जातात. तेव्हा लोकशाहीत भीतीचे वातावरण निर्माण होते. ही भीतीच सर्वात मोठी शस्त्र असते. गोळीपेक्षा भयानक असते “दहशतीची सावली”. या सर्व केवळ स्वतंत्र घटना नाहीत असे अनेकांना वाटते. जणू एखादा संदेश दिला जातो. लोकशाहीत विचारवंत मरतात, तेव्हा माणूस मरत नाही, विचारांची हत्या होते. आणि जेव्हा विचार मरतात, तेव्हा राष्ट्र हळूहळू गुलाम बनते. म्हणूनच अंतिम प्रश्न: आपण घटनांना ‘अपघात’ म्हणत राहणार का? की लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणार कारण लोकशाहीत मौन हेच सर्वात मोठे षडयंत्र असते.
(या लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तिक आहेत. त्याच्याशी मॅक्स महाराष्ट्र सहमतच असेल असे नाही.)

डॉ. सुभाष के देसाई
वयाच्या 19व्या वर्षापासून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार, लेखक, पर्यटक, गिर्यारोहक, संशोधक, धर्म आणि विज्ञान विषयातील तज्ञ अशा विविध भूमिकेतून कार्यरत असणारे डॉक्टर सुभाष के देसाई हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. गुलमोहर आर्ट गॅलरी येथे संस्थापक आहेत दैनिक सिंहवाणीचे संस्थापक संपादक, पीटीआय, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, सकाळ, पुढारी अशा विविध वृत्तपत्रात लिखाण केले अकॅडमी ऑफ रिलीज युनिटी या विविध धर्मांना एकत्र आणणाऱ्या संस्थेचे ते संस्थापक आहेत. शिवाजी विद्यापीठात वृत्तपत्र विद्या विभागात त्यांनी 25 वर्षे योगदान केलेले आहे. जवळजवळ 30 देशांमध्ये, साऱ्या हिमालयात त्यांनी भ्रमंती केली आहे. अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले जगातील आणि देशातील अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींशी त्यांचा संपर्क आला याशिवाय स्वामी विवेकानंद या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर आजन्म प्रभाव राहिला ते अविवाहित असून बहुजन हिताय बहुजन सुखाय हे त्यांनी जीवनाचे ध्येय ठेवले.





