रोहित पवार... इज इन ट्रेंडिंग.
Rohit Pawar... is in trending.
X
आमदार रोहित पवार यांनी स्व.अजितदादा यांच्या अपघाताच्या चौकशीचा उचलून धरलेल्या मुद्द्यांमध्ये लक्षणीय सातत्य दिसते आहे. कदाचित हा खरोखरच अपघातही असू शकतो. कोणत्याही पुराव्याशिवाय कुणीही घातपाताची शक्यता बाळगणे घाईचे ठरु शकते असे व्यक्तिशः वाटते.
यंत्रणा चौकशी करतीलच. त्याची वाट पाहणं आवश्यक वाटते. पवार कुटुंबीय किंवा त्यांचे कार्यकर्ते यावर अत्यंत दुःखी आणि संवेदनशील असणं साहजिकच आहे..पण महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेलाही दादांच्या अकल्पित आणि भयावह अपघाताविषयी मनमेंदूत असंख्य शंकाकुशंका आहेत ही वस्तुस्थिती आहे. नेमका तोच प्रश्न आमदार रोहित पवारांनी लावून धरला आहे.
इतक्या मुद्द्यांसह, कागदोपत्री सादरीकरण करत रोहित पवार प्रथम महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेऊन आणि नंतर थेट दिल्लीत धडकून थेट विमान वाहतूक मंत्र्यांचा राजीनामा मागतात. यावरून त्यांचं या विषयावरचे लक्ष्य कळते आणि ते यावर गंभीर आहेत हेही ध्यानात येते.. अर्थात रोहित पवार ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या तिसऱ्या पिढीतील राजकीय उत्पत्ती आहे.
साहेबांच्या अफाट राजकीय, प्रशासकीय अनुभवाच्या, कौशल्याच्या तालमीत ते तयार झाले आहेत. रोहित पवार, हा विषय सन्माननीय पवारसाहेबांच्या परवानगीशिवाय, सल्ल्याशिवाय स्वतंत्रपणे मांडत असतील हे केवळ अशक्य आहे.
मग मुद्दा हा येतो..की, दादांच्या अपघाताच्या दिवशीच, काही वेळातच त्यांच्या अकल्पित निधनाने धक्का बसलेले त्यांचे काका, त्यांचे राजकीय गुरू आणि सर्वस्व सन्माननीय श्री शरद पवार हा घातपात नसून फक्त अपघात आहे असं पत्रकारांसमोर स्पष्ट करतात.
अर्थात पवारसाहेबांच्या वक्तव्याला अवघा महाराष्ट्र काय देशही मानतो..
त्यांनी सांगितलं विषय संपला होता.. संपायला हवा होता.!
मग हा 'विरोधाभास' काय आहे...
कदाचित त्या दिवशी संतप्त जनतेचा उत्स्फूर्त उत्पात होऊ नये याचा अदमास आल्यानं त्यांनी तशी भूमिका ( म्हणजे.. अपघात आहे बाकी काहीही नाही..) घेतल्याचं अनेकांनी मत व्यक्त केले आहे. अर्थात पवार कुटुंबातील कुणीही त्यावर अधिकृतपणे मतप्रदर्शन अद्यापही केलेले नाही. या विषयाचा छडा जो काही आहे तो यथावकाश लागेलच पण दादांच्या अपघाताच्या चौकशीच्या निमित्तानं रोहित पवार महाराष्ट्रच नव्हे तर देशभर माध्यमांमध्ये चर्चेत आले आहेत. अर्थात ते केवळ मागणी करत नाहीयेत. बरेच खोलवर जाऊन कागदोपत्री अभ्यासह टू द पॉईंट एखादा कायदेतज्ज्ञ मांडेल.. असे मुद्दे उत्तम मांडणीसह अख्ख्या जनतेला समजेल इतक्या सोप्या शब्दांत मांडताहेत..
दिसायला ग्रामीण बाजाचा, साधा दिसणारा हा युवक आमदार मेंदूने तल्लख वाटतोय. आणि धाडसीही दिसतो आहे..
दादांच्या अपघाताच्या चौकशीच्या निमित्तानं दिल्लीत जाऊन पत्रकारांशी अस्सखलीत हिंदी आणि इंग्रजीत कुठेही न अडखळता प्रवाही बोलत त्यांनी ते फक्त अहमदनगर, बारामतीपुरते राजकारणी नाहीत हे दाखवून दिले आहे..असे या निमित्तानं तरी महाराष्ट्रभर जातेय.!
मुळात स्व.अजितदादांची महाराष्ट्रभर असलेली अफाट लोकप्रियता मरणोत्तर कैक पटीने वाढली आहे. बहुसंख्य लोकांना अजितदादांच्या बाबतीत नक्की काय झाले हे जाणून घ्यायची तीव्र इच्छा आहे..असे असंख्य लोकांच्या टिव्ही आणि सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रियांमधून दिसते आहे.
चाणाक्ष रोहित पवारांनी जनतेची ही नस बरोब्बर ओळखून हा विषय मुद्दे आणि कागदपत्रे दाखवत उचलून धरलेला आहे.
त्यात ते सवंग लोकप्रियतेच्या आहारी गेलेले दिसत नाहीत. त्यांनी कुणावरही वारेमाप व्यक्तिगत आरोप केलेले नाहीत. ते फक्त विमान वाहतूक कंपनीवर शरसंधान करत आहेत..( याबाबत सबंधित विमान कंपनी निर्दोष असेल तर रोहित पवारांवर अब्रुनुकसानीचा दावा का ठोकत नाहीये.!)
रोहित पवारांना उघडपणे सक्रीय पाठिंबा सन्माननीय शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे देत नाही आहेत..
पण..सुप्रियाताईंनी रोहित पवार यांना संरक्षण मिळावे अशी मागणी नुकतीच केली ती या विषयाला अनुसरूनच आहे.. असणार.!
रोहित पवार यांच्यासोबत आता दादांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवारही मैदानात आले आहेत. हे दोघेही नातू सन्माननीय शरद पवार यांचे विशेष जवळचे राजकीय वारसदार आहेत हे यापूर्वी राष्ट्रवादी पक्षांतर्गत वादात राजकीय घडामोडींमध्ये स्पष्ट झाले होतेच.!
एक बाब महत्वाची आहे. संपूर्ण पवार कुटुंबीयांपैकी कुणीही रोहित पवार चुकीच्या दिशेने जात आहेत असं म्हटलेलं नाही.
याचा अर्थ दादांच्या अपघाती मृत्यूची चौकशी व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे असा होत नाही का.!
या चौकशीच्या निमित्तानं रोहित पवार हे.. एकाच दगडात अनेक पक्षी अडचणीत आणतायत असे दिसते आहे.
दादांच्या अत्यंत जवळचे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेतेमंडळी दादांच्या अपघातावर चकार शब्द काढायला तयार होत नाहीयेत हे अख्ख्या महाराष्ट्राच्या नजरेस ते आणून देतायत का..
रोहित पवारांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचा त्यांच्या चौकशीच्या मागणीला पाठिंबा असल्याचा दावाही केला आहे.
आणि नेमकं आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या विमान कंपनीची विमाने यापुढे खरबदारी म्हणून प्रवासासाठी वापरणार नसल्याच्या बातम्या आल्या.!
दादांच्या नसण्यानं स्वतः मुख्यमंत्री दुःखी आहेत..संवेदनशील आहेत असं त्यांच्या सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील प्रतिक्रियांनी दिसते आहे.
दोघांचा उत्तम स्नेह होता..आणि राज्यकारभारात दोघांची केमिस्ट्रीही छान जुळलेली होती.!
असो. दादांचे चिरंजीव जय पवार यांनी अपघाताविषयी उपस्थित केलेली शंका आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्याचं मिडियासमोर सांगायला रोहित पवार विसरलेले नाहीत.!
दादांच्या चिडवण्यानं केस कापलेले रोहित पवार खतरनाक दिसतायत सध्या.!
खरं तर हा विषय जर संबंधित अपघात क्षेत्रातील पोलिसांनी यावर रोहित पवारांनी गुन्हा नोंदवून घ्यायची विनंती केली तेव्हा जर तो घेतला गेला असता तर कदाचित याविषयीची तीव्रता पुष्कळ कमी झालीही असती..
पण पोलिसांच्या नकारामुळे.. रोहित पवारांसह मिडिया आणि जनतेच्या भुवयाही उंचावल्या आहेत.!
एफआयआर हा जनतेचा किंवा कुणाही नागरिकाचा गुन्हा नोंदवण्याचा संविधानिक, वैधानिक अधिकार आहे मग तो नोंदवायला काय प्रॉब्लेम आहे असं रोहित पवार विचारतायत.!
गुन्हा नोंदवल्याने तो सिद्ध होतोच असेही नाही.. चौकशीची प्रक्रिया सुरू होते.
या चौकशीत गरज नाही की, घातपातच बाहेर निघेल..तो अपघात आहे यावरही कदाचित शिक्कामोर्तब होऊ शकेल.
बरं रोहित पवार त्यांनी केलेल्या आरोपांची संपूर्ण जबाबदारी घ्यायलाही तयार आहेत.
मी जर याबाबत खोटा ठरलो तर माझ्यावर कायदेशीर कारवाई करा असे ते स्पष्टपणे सांगतायत...
मग प्रॉब्लेम काय आहे.!
#NeedToKnow
#TheFactsOnly.






