Home > Top News > पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीट : मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान, दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीट : मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान, दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीट : मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान, दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
X

MaharashtraWeather भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता त्यानुसार मराठावाडा आणि विदर्भात गारपीट आणि पावसामुळे पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. यात दोन जणांना जीव गमवावा लागला. नांदेड परभणी, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काल वादळी पावसाने हजेरी लावली, लातूर जिल्ह्यातील रेणापूर आणि बीड जिल्ह्यांतील काही भागास गारपिटीचा तडाखा बसला. या गारपीट मुळे शेतात काम करताना दिगंबर राम बेलकुंडे आणि विशाखा सचिन येलकेवाड या महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाला. विदर्भतील हिंगणघाट, समुद्रपूर येथे काही ठिकाणी बोरांच्या आकाराएवढ्या गारांचा मारा झाला आहे. नागपुरात वादळी वाऱ्यांने झाडे पडली. वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात काही ठिकाणी बोराएवढ्या आकाराच्या गारा पडल्या. पुसद, दिग्रस, कळंब, उमरखेड, महागाव, फुलसावंगी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यात गहू, ज्वारी, हरभरा, तुरीचे नुकसान झाले.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आजही काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पिकांचे नुकसान

अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे ज्वारी-गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले आहे कापलेला हरभरा भिजला, आंब्याचा मोहरही गळाला आहे. यात फळबागांचेही मोठं नुकसान झालं आहे. विजेचे खांब, झाडेही कोसळली. अनेक भागात कापणीवर आलेला गहू जमीनदोस्त झाला आहे.नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्याचं काम आज पासून केल जाणार आहे.

दोन दिवस पाऊसाची शक्यता -

हवामान विभागाने येत्या दोन दिवस आणखीन अवकाळी पाऊसाची श्यक्यता वर्तवली आहे. दोन त्यानंतर आकाश स्वच्छ, निरभ्र होणार आहे. हवामानतज्ज्ञच्या मते बंगालच्या खाडीवरील कमी दाबाचे क्षेत्र पुढील २४ तासांत कमजोर होणार असून रविवार-सोमवारी निर्माण झालेली ढगाळ स्थिती पूर्णपणे नाहिशी होईल. दोन दिवसांनी विदर्भ-मराठवाड्यातील पाऊस थांबून संपूर्ण राज्यात निरभ्र आकाश पाहायला मिळणार आहे.

Updated : 24 Feb 2026 4:51 PM IST
Next Story
Share it
Top