BJP IT Cell New Propaganda : "मोदी आहेत म्हणून भारत सुरक्षित"? सत्य वाचा
X
war-like situation सध्या या युद्धजन्य परिस्थितीत भाजप आयटी सेल ने नवा प्रोपोगंडा BJP IT Cell propaganda सुरू केला आहे.
"India is safe because of Modi" "मोदी आहेत म्हणून भारत सुरक्षित आहे" अशा प्रकारचा प्रचार जोरात सुरू आहे. आणि ज्यांचा जन्मच 2014 नंतर झाला किंवा जे 2014 नंतर अंड्यातून बाहेर पडले त्यांना हे सुद्धा खरे वाटते आहे. जगात आज १९५ देश आहेत. त्यापैकी Russia-Ukraine or Israel-Iran, रशिया-युक्रेन किंवा इस्रायल-इराण यांसारखे मोजके अपवाद वगळता, उर्वरित १७० पेक्षा जास्त देशांमध्ये कोणतीही बॉम्बफेक होत नाहीये. मग त्या सर्व देशांमध्ये non-biological नॉन बायोलॉजिकल विश्वगुरू आहेत का?
India national security भारताची आजची सुरक्षा ही जागतिक नेत्यांना मिठ्या मारून आणि नुसते खी खी खी खी करून उभी राहिलेली नाही. तर भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या वर्षापासून केलेल्या 'कामावर' उभी आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या वर्षभरात, १९४८ मध्ये जेव्हा देश गरिबीशी, भुकेशी, अनेक संसर्गजन्य रोगांशी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील वक्रदृष्टींशी झुंजत होता, अशा बिकट काळात तेव्हा Jawaharlal Nehru nuclear vision पंडित जवाहरलाल नेहरूंनी डॉ. होमी भाभा Homi J. Bhabha atomic energy program यांच्या सहकार्याने अण्वस्त्र कार्यक्रमाचा पाया रचला. त्या काळी १९४८ मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना करणे ही नुसती वैज्ञानिक जिद्द नव्हती, तर ती एक प्रचंड मोठी दूरदृष्टी होती.
नेहरूंनी तेव्हा ओळखले होते की भविष्यात केवळ शांततेच्या तत्वज्ञानावर भाषणे देऊन देश सुरक्षित होणार नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित स्वनिर्मित अणुशक्ती देशाला सुरक्षित ठेवेल. India military insurance nuclear weapons आज भारताची स्वतःची अण्वस्त्रे हाच आपला सर्वात मोठा लष्करी विमा आहे. देशाची सुरक्षा केवळ सीमा सुरक्षित करून थांबत नाही. India IT industry growthती अर्थव्यवस्थेतही असते. जागतिकीकरणामुळे आज भारताचा अमेरिकेसोबत प्रचंड मोठा व्यापार आहे. डॉ मनमोहन सिंग Manmohan Singh economic liberalization यांच्या दूरदृष्टीमुळे आर्थिक उदारीकरनंतर कित्येक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे भविष्य भारताशी जोडलेले आहे.
गेल्या ७५ वर्षांत भारताने व्यापाराचे जे जाळे विणले आहे, त्याने देशाभोवती एक अभेद्य तटबंदी (Moat) निर्माण केली आहे. Rajiv Gandhi राजीव गांधींच्या काळात रचलेल्या IT आयटी उद्योगाची पायाभरणी, त्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी घेतली गेलेली शैक्षणिक धोरणे आणि त्यापोटी तंत्रज्ञान सेवाक्षेत्रात निर्माण झालेले जगाचे भारतावरचे अवलंबित्व हे सुद्धा आपल्या सुरक्षेचे महत्वाचे कारण आहे. जर भारतावर हल्ला झाला, तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. ही आर्थिक गुंतवणूक सुद्धा भारताची सुरक्षाच करत आहे.
जर १९४८ मध्ये अणुऊर्जेचा पाया रचला गेला नसता, दूरदृष्टी बाळगून आर्थिक शैक्षणिक धोरणांतून जगाशी नाते निर्माण केले नसते तर भारताची सामरिक सुरक्षा आज च्या सारखी मजबूत असती का? मोदींनी सर्व काही केले असे म्हणणे म्हणजे गेल्या सात दशकांतील हजारो शास्त्रज्ञ, लष्करी अधिकारी आणि धोरणकर्त्यांच्या मेहनतीचा अपमान करण्यासारखे आहे. तरीही हे सगळे विसरलेल्या आणि कृतघ्न झालेल्या आपल्या समाजाला याची वारंवार आठवण करून द्यावी लागते हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल.






