Home > Top News > Gas cylinder shortage : युद्ध झळा - इंधनटंचाईने Mumbai शहराची अन्नव्यवस्था ठप्प !

Gas cylinder shortage : युद्ध झळा - इंधनटंचाईने Mumbai शहराची अन्नव्यवस्था ठप्प !

“ग्राहक आहेत, कर्मचारी आहेत, पण गॅस नाही आम्ही स्वयंपाक कशावर करायचा?” युद्धाच्या झळा आर्थिक राजधानी मुंबईला... काय आहे मुंबईकर आणि मुंबईच्या अन्नव्यवस्थेची स्थिती सांगताहेत रेणुका कड

Gas cylinder shortage : युद्ध झळा - इंधनटंचाईने Mumbai शहराची अन्नव्यवस्था ठप्प !
X

Mumbai LPG crisis मुंबई हे कधीही न थांबणारे शहर. ह्या मुंबईने आजपर्यंत अनेक संकटे झेलले. कष्टकर्‍याची मुंबई कधी थांबत नाही. मुंबई मेरी जान म्हणत हे शहर देशाच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या प्रत्येक कामगाराला जगायला शिकवते. कामाच्या शोधत येणार्‍या प्रत्येक व्यक्तिने त्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात रस्त्यावरील वडापाव, समोसा पाव, अण्णाची इडली-वाडा आणि अनलिमिटेड सांबार चटणीनेच केली असे म्हटयास अतिशयोक्ति होणार नाही. सकाळी चार वाजे पासून ते रात्री उशिरापर्यंत मुंबई शहरातील छोटे ठेले, टपरी आणि खाऊ गल्ली सुरू आहे. शहराच्या वेगाने चालणार्‍या ट्रेन आणि तेवढ्याच वेगाने चालणारी इथली Mumbai food supply disruption अन्नव्यवस्था. सकाळच्या वडापावच्या गाड्यांपासून ते रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या खानावळी, घरगुती डबेवाले आणि मोठ्या हॉटेल्सपर्यंत, लाखो लोक रोज या व्यवस्थेवर अवलंबून आहेत. मात्र सध्या US Iran Israel conflict impact Indiaअमेरिका, इराण, इस्त्रायलच्या युद्धामुळे या संपूर्ण व्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे.

व्यावसायिक एलपीजी (स्वयंपाक गॅस) सिलिंडरची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने मुंबईतील हॉटेल्स, स्ट्रीट फूड विक्रेते आणि डबेवाल्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. ही केवळ इंधनटंचाई नसून उपजीविका, अन्नसुरक्षा आणि शहराच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे मोठे संकट बनले आहे.

टपर्‍या ते हॉटेल्स बंद, दर वाढले

मुंबईतील अनेक लहान मोठे हॉटेल्स आणि घरगुती खानावळींना गॅसअभावी कामकाज बंद करावे लागले आहे. अंदाजे २० टक्के उपाहारगृहे तात्पुरती बंद पडली आहेत, तर जे सुरू आहेत ते कमी क्षमतेने आणि जास्त दराने सुरू आहेत. “ग्राहक आहेत, कर्मचारी आहेत, पण गॅस नाही आम्ही स्वयंपाक कशावर करायचा?” दादर स्टेशनजवळील एका हॉटेल मालकाने सांगितले. “दररोज अनिश्चिततेत दुकान उघडतो. ही परिस्थिती अशीच राहिली तर हॉटेल बंद करावे लागेल.” गॅसच्या वाढत्या किमतींमुळे अनेकांनी पदार्थांच्या किमती १० ते २० टक्क्यांनी वाढवल्या आहेत. उद्योग संघटनांनी इशारा दिला आहे की ही परिस्थिती कायम राहिल्यास ५० टक्क्यांपर्यंत हॉटेल्स बंद पडू शकतात.

स्ट्रीट फूड विक्रेते सर्वाधिक प्रभावित

मुंबईची ओळख असलेले वडापाव, भजी, समोसे, इडली-वाडा विकणारे स्ट्रीट फूड विक्रेते सर्वाधिक संकटात आहेत. “पूर्वी दिवसाला ३०० वडापाव विकायचो, आता १०० सुद्धा होत नाहीत,” कुर्ला येथील एका विक्रेत्याने सांगितले. “गॅस मिळत नाही किंवा खूप महाग मिळतो. स्वयंपाक नाही तर उत्पन्न नाही.” अंधेरीतील एका विक्रेत्याने सांगितले: “तासनतास रांगेत उभं राहतो, तरी सिलिंडर मिळत नाही. काही जण काळ्या बाजारात दुप्पट दराने विकतात. आम्ही कसं करायचं?” ही परिस्थिती केवळ विक्रेत्यांची नाही, तर कमी दरात पोट भरणार्‍या कष्टीकरी वर्गाचीही आहे. अल्पदरात मिळणार्‍या अन्नावर अवलंबून असलेल्या लाखो नागरिकांची आहे.

डब्बेवाले आणि टिफिन सेवा विस्कळीत

मुंबईची प्रसिद्ध डब्बेवाला व्यवस्थादेखील या संकटामुळे प्रभावित झाली आहे. “मी रोज ५० डब्बे बनवायचे, आता २५ वर आले आहे,” घाटकोपरमधील एका गृहिणीने सांगितले. “पर्यायी साधनांवर स्वयंपाक करायला वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात. ग्राहकही कमी झाले.” डब्बेवाला कर्मचाऱ्याने सांगितले: “डब्बे कमी झाले की आमचं कामही कमी होतं. आम्ही सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत. हा परिणाम साखळीप्रमाणे सगळ्यांवर होतो.” घरगुती डब्बे बनवणाऱ्या महिलांवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. “हेच आमचं एकमेव उत्पन्न आहे. गॅस नाही तर स्वयंपाक नाही, आणि उत्पन्नही नाही,” मालवणीतील एका महिलेने सांगितले.

पुरवठा विस्कळीत, काळाबाजार वाढतोय

सिलिंडर मिळण्यासाठी ८ ते १० दिवसांचा विलंब होत असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, किमती वाढल्या असून काळाबाजाराचे प्रमाणही वाढले आहे. “पुढचा सिलिंडर कधी मिळेल याची काहीच खात्री नाही,” भायखळ्यातील एका हॉटेल चालकाने सांगितले. “मेन्यू, कर्मचारी काहीच नियोजन करता येत नाही.” “जास्त पैसे देऊन गॅस घ्यावा लागतो, नाहीतर ग्राहक कायमचे जातील,” दुसऱ्या विक्रेत्याने सांगितले.

जागतिककारणांचा स्थानिक परिणाम

ही टंचाई केवळ स्थानिक नाही, तर आंतरराष्ट्रीय परिस्थितीशी जोडलेली आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. मात्र, सामान्य विक्रेत्यांसाठी हे कारण गौण आहे. “आम्हाला आंतरराष्ट्रीय राजकारण कळत नाही,” एक विक्रेता म्हणाला. “आमच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आज आमची चुल पेटते का नाही.”

उपजीविकेवर मोठा परिणाम

या संकटामुळे हजारो कामगारांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे. “एक दिवस काम नाही म्हणजे त्या दिवशी घरात अन्न नाही,” एका हॉटेलमधील कामगाराने सांगितले. “अशी परिस्थिती किती दिवस सहन करायची?” मीरारोड, वसई विरार, कुर्ला याठिकाणी अनेक स्थलांतरित मजूर काम करतात. यातील मजुरांनी सांगितले की, आमच्यातील काही लोक गावी परत जायला निघाले आहे.,”जिस दिनसे पीएम मोदी ने कोविड-19 जैसे लॉकडाउन का संकेत दिया उसदिनसे लोग जो ट्रेन मिले वो पकडकर गाव जा रहे है”. डर का माहोल बना है. हमारे लिये तो जीने मरने का सवाल है. असे मत लोकांनी व्यक्त केले.

अन्नसुरक्षेचा प्रश्न

शहरातील अनेक लोक स्वस्त बाहेरील अन्नावर अवलंबून आहेत. “स्ट्रीट फूड बंद झालं तर आमच्यासारख्यांना मोठी अडचण होते,” एका मजुराने सांगितले. “घरी स्वयंपाक करणं नेहमी शक्य नसतं. कामासाठी सकाळीच घर सोडतो त्यामुळे जेवण तयार करून घेण शक्य नसते” 25 रुपयात मिळणारी इडली आज 40 रुपये झाली आहे. 10 रुपयाचा चहा 20 रुपये झाला आहे. त्यामुळे रोजचं 60 रुपये जेवणासाठी खर्च करण परवडत नाही.

तत्काळ उपायांची गरज

या परिस्थितीत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. ”अन्न व्यवसाय ही आवश्यक सेवा आहे, हे सरकारने समजून घ्यायला हवे,” एका हॉटेल मालकाने सांगितले. “स्वयंपाक बंद झाला तर शहर थांबेल.” मुंबईतील एलपीजी संकट हे केवळ तात्पुरते नाही, तर भविष्यासाठी इशारा आहे. एकाच इंधनावर अवलंबून असलेली अन्नव्यवस्था किती असुरक्षित आहे, हे यातून स्पष्ट होते. ह्या सगळ्या परिस्थितीवर मत व्यक्त करताना एका विक्रेत्याने सद्यस्थिती एका वाक्यतून सांगितली,

“हा फक्त गॅसचा प्रश्न नाही, हा आमच्या जगण्याचा प्रश्न आहे.” अर्थात,’ युद्ध ही बहुजनांच्या रक्तावर आणि अभिजनांच्या तोंड देखल्या राष्ट्रप्रेमावर लढली जातात. युद्धाची खरी गरज शस्त्राच्या कारखानदारांना आणि सत्तेला आपले मुलकी अपयश झाकण्यासाठी असते’.

Updated : 28 March 2026 11:00 AM IST
Next Story
Share it
Top