Home > Top News > Asha Bhosle last Instagram post : मृत्यूची चाहूल लागत असते का? आशाताईंच्या पोस्टचा अर्थ काय सांगतो?

Asha Bhosle last Instagram post : मृत्यूची चाहूल लागत असते का? आशाताईंच्या पोस्टचा अर्थ काय सांगतो?

Asha Bhosle last Instagram post : मृत्यूची चाहूल लागत असते का? आशाताईंच्या पोस्टचा अर्थ काय सांगतो?
X

Asha Bhosle last words माणसाला त्याच्या मृत्यूची, मोक्षाची चाहूल लागत असेल का! आशाताईंनी त्यांच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जे काही लिहिलं आहे, ते याकडेच निर्देश करते. आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये आशाताई, इंटरनॅशनल बँड 'गोरिल्लाज' सोबत दिसल्यात. पोस्टमधील फोटोच्या बॅकग्राउंडमध्ये भारतीय वस्त्या, हत्ती आणि जीर्ण झालेल्या वस्तूंची दृष्टीस पडतात.

या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय -

"The Shadowy Light' या गाण्याचा माझ्यासाठी अत्यंत सखोल अर्थ आहे. वाराणसीला भेट देऊन आणि पवित्र गंगा नदीच्या काठानं प्रवास करून, तसेच तिथे मला जे काही दिसलं, त्याचं बारकाईनं निरीक्षण करून आणि ते समजून घेऊन, मला जीवनाचा खरा अर्थ उमजला, मी कोण आहे आणि या पृथ्वीवर माझे काय प्रयोजन आहे...

'द शॅडोई लाइट' (The Shadowy Light) मध्ये, या खोल नदीचा पैलतीर गाठणं हे माझ्या जीवनप्रवासाचं प्रतीक आहे, माझा जन्म, माझे नातेसंबंध, संगीताप्रतीची माझी निष्ठा, माझी कर्तृत्व आणि एक कन्या, माता, भगिनी, पत्नी आणि एक हिंदू भारतीय म्हणून माझी कर्तव्य. या प्रवासात, 'संगीत' हाच माझा नावाडी आहे, तो मार्गदर्शक, जो मला या जीवननदीच्या पैलतीरी घेऊन जातो. जेव्हा मी त्या पैलतीरावर पोहोचेन, तेव्हा माझा हा प्रवास पूर्ण होईल. तेव्हा मला 'मोक्ष' प्राप्त होईल, आपल्या सभोवताली सतत तरंगणाऱ्या अगणित नादांमध्ये मी विलीन होईन.

जेव्हा त्यातील काही नाद एकत्र गुंफले जातात, तेव्हा त्यातून एक सुंदर सुरावट निर्माण होते. त्याचप्रमाणे, मी देखील त्या नादांपैकीच एक नाद बनेन, असा नाद, जो अंतिमतः एका सुंदर गीतातील सुराचं रूप धारण करेल. असं गीत, जे पिढ्यानपिढ्या, हजारो वर्षे सातत्यानं ऐकलं जात राहील. हेच स्वातंत्र्य, निसर्गाशी एकरूप होण्याचं स्वातंत्र्य, नदीच्या पलीकडील तीरावर माझी वाट पाहत आहे..."आशाताईंना अखेरच्या प्रवासाविषयी काही जाणवलं असेल का? की हा निव्वळ योगायोग असेल. कळायला मार्ग नाही.

गावाकडे जुनी जाणती माणसं म्हणतात की, काहींना आपला अंतिम काळ जवळ आल्याचं कळत असतं. ती माणसं तशा अर्थाचं काही सूचक बोलून जातात. ते जेव्हा बोलतात तेव्हा आपल्याला कळत नाही, त्यांच्या पश्चात आपण अन्वयार्थ लावत राहतो. ही एक हूरहूर लावणारी भासयुक्त चाहूल आहे!

- समीर गायकवाड

Updated : 13 April 2026 12:04 PM IST
Next Story
Share it
Top