AI and Job : “नोकऱ्या नाहीशा, पण पैसा कुठून? विनोद खोसलांच्या भाकितावर संजीव चांदोरकर यांचे प्रश्न !
X
Indian-American investor Vinod Khosla विनोद खोसला... हे भारतीय वंशाचे जगप्रसिद्ध व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत world-renowned venture capitalist of Indian origin . दिल्ली मध्ये सुरू असलेल्या Artificial Intelligence Conference in Delhi. आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिषदेत त्यांनी केलेली वक्तव्ये खालील प्रमाणे आहेत. (संदर्भ हिंदू बिझनेस लाइन १८ फेब्रुवारी २०२६, पान क्रमांक १).
“ २०५० पर्यंत सर्व वस्तुमाल उत्पादन आणि सेवा पुरवण्याचा खर्च शून्यावर आलेला असेल. लोकांना नोकऱ्या करायची गरज भासणार नाही. (By 2050 nobody needs jobs, because production of goods and services will become nearly free). लोक नोकऱ्या करतील पण त्यासाठी त्यांना अत्यंत थोडा वेळ द्यावा लागेल. त्यांच्याकडे आपल्या कुटुंबासाठी, आपले छंद जोपासण्यासाठी भरपूर वेळ उपलब्ध असेल” ते पुढे म्हणतात की एआयचा वापर एखाद्या देशांत किती आणि कोठे होणार हे तंत्रज्ञ नव्हे तर त्या देशातील राजकारणी ठरवतील, (Politics and not technical capabilities will be the key determinant)”
काही निरीक्षणे आणि प्रश्न
१. समजा वस्तुमाल आणि सेवा उत्पादन पूर्णपणे यंत्राने केले तरी कोणत्याही वस्तुमाल / सेवेसाठी अतिशय गुंतागुंतीची सप्लाय चेन असते. फायनल प्रॉडक्ट ऑटोमेटेड महाकाय विना कामगार असणाऱ्या कंपनीत झाले तरी त्या आधीच्या उत्पादन पायऱ्यांचे आणि कॉस्टिंगचे काय ?
२. हे सर्व उत्पादक खाजगी कॉर्पोरेट असणार आहेत. स्वयंचलित, एआय आधारित उद्योग प्रचंड भांडवल सघन असणार आहेत. फक्त मानवी श्रम मशीनने केले तरी वीज वगैरे लागणार. दुसऱ्या शब्दात रनिंग कॉस्ट कमी झाली तरी कॅपिटल कॉस्ट वाढलेली असेल
३. या सर्व खाजगी कंपन्या समाज हितार्थ नाही चांगल्या नफ्यासाठी हा उपदव्याप करणार. म्हणजे त्या वस्तुमालाच्या किंमती असणार ? ते बाजारात विकणार. म्हणजे लोकांनी बाजारभावाप्रमाणे विकत घ्यावे अशी अपेक्षा असणार. म्हणजे लोकांकडे क्रयशक्ती हवी. लोकांना नोकऱ्या करायची गरज नाही म्हणतात तर त्यांच्याकडे क्रयशक्ती कोठून येणार?
४. ज्याप्रमाणात अजस्त्र इकॉनॉमीज ऑफ स्केल करत कल्पनातीत प्रमाणावर वस्तुमालाचे उत्पादन होईल त्याप्रमाणात याच जागतिक शासक वर्गाकडून युनिव्हर्सल बेसिक इन्कम प्रस्ताव पुढे रेटण्यात येईल. सार्वजनिक पैशातून, रोखे उभारून त्यातील काही भाग यूबीआय मार्फत देण्यात येईल. लाडकी बहीण, त्याचा पायलट प्रकल्प आहे.
५ एआय उद्योगासाठी भरमसाठ वीज / पाणी / जमिनी लागणार आहेत. त्याचे परिणाम पर्यावरणावर होणार आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष. वीज महागणार. त्याबद्दल हे लोक काहीही बोलणार नाहीत. “मार्केट फोर्सेस विल टेक केयर”वाले लोक आहेत हे.
६ भारतासारख्या शेतीप्रधान अर्थव्यवस्थांचे काय ? या देशात अर्धी लोकसंख्या तरुण आहे त्यांचे काय ? देशात वाढणाऱ्या आर्थिक विषमतेचे काय? त्यातून वाढू शकणाऱ्या सामाजिक, राजकीय असंतोषाचे काय? हा भारताचा नाही जगातील किमान ६०० कोटी लोकसंख्येचा प्रश्न असू शकेल.
७ म्हणे लोक आपापले छंद जोपासायला अधिक वेळ मिळेल, उघड आहे हे समाजातील एलिट वर्गाबद्दल बोलत आहेत.
विनोद खोसला कोणी असे तसे व्यक्तिमत्व नाही. की ज्यांनी केलेल्या भाकितांकडे युटोपियन म्हणून दुर्लक्ष करावे. ते जागतिक वित्त भांडवलाचे, जागतिक शासक वर्गाचे एक महत्वाचे सभासद आहेत. त्यांनी जी काही भाकिते केली आहेत ती तशीच्या तशी, त्याच वर्षात सिद्ध होतील असे देखील नाही. पण त्यातून त्या वर्गाचा जगाकडे, भविष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन समोर येतो त्याची दखल घेतली पाहिजे.
तरुणांनो, कोणाच्याच उच्च शिक्षणाचे, जागतिक कीर्तीचे दडपण न बाळगता तुमच्या आयुष्याशी संबंधित ठोस प्रश्न विचारायला सुरुवात करा. त्यासाठी चहाच्या टपरीवर, अड्यावर… जेथे जमाल तेथे आपसात चर्चा करा. आपल्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल प्रश्न विचारणे म्हणजे तुम्ही तंत्रज्ञान-विरोधी ठरत नाही, ना बॅकवर्ड ठरता. एआय मध्ये “भारता”ची घोडदौड किंवा एआय क्षेत्रात “भारता”चा बोलबाला…हे जे सांगितले जाते/ जाईल त्यावेळी विचारा की ही “भारत” नावाची कोणी व्यक्ती आहे का ? किंवा “भारत” नावाची मुंबई स्टॉक मार्केट वर लिस्टेड कंपनी आहे का ? वाटलं होते त्यापेक्षा खूप लवकर गोष्टी येऊन सर्वांवर आदळणार आहेत हे नक्की
संजीव चांदोरकर (२३ फेब्रुवारी २०२६)






