Home > Top News > तेलसंकट टळलं ; इराणमधून भारतासाठी गुडन्यूज

तेलसंकट टळलं ; इराणमधून भारतासाठी गुडन्यूज

इराणकडून भारतासह मित्रदेशांना मार्ग मोकळा

तेलसंकट टळलं ; इराणमधून भारतासाठी गुडन्यूज
X

पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान यांना जोडणारी अत्यंत महत्त्वाची ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’ सध्या जागतिक तणावाच्या केंद्रस्थानी आली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची (Seyed Abbas Araghchi) यांनी स्पष्ट केले की, भारतासह चीन आणि रशिया या मित्रदेशांना या सामुद्रधुनीतून व्यावसायिक जहाजवाहतुकीस परवानगी दिली जात आहे.




इराणने अलीकडेच या महत्त्वाच्या समुद्री मार्गावर निर्बंध लादल्यानंतर जागतिक तेल आणि एलएनजी (द्रवीकृत नैसर्गिक वायू) किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. जगातील सुमारे २० टक्के तेल व गॅस वाहतूक या सामुद्रधुनीतून होते, त्यामुळे येथे होणारा कोणताही अडथळा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरतो.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी इराणला कडक इशारा देत, हॉर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे सांगितले आहे.

इराणच्या भूमिकेनुसार, त्यांच्या विरोधकांशी संबंधित जहाजांना या मार्गाचा वापर करण्यास मनाई राहणार आहे. “हा परिसर सध्या युद्धजन्य स्थितीत आहे. आमच्या शत्रूंच्या आणि त्यांच्या सहयोगी देशांच्या जहाजांना मार्ग देण्याचे कोणतेही कारण नाही,” असे अराघची यांनी नमूद केले.

दरम्यान, भारताने पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच, ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’तून ऊर्जा पुरवठा सुरळीत राहावा यासाठीही भारत प्रयत्नशील आहे. पश्चिम आशिया हा भारतासाठी कच्च्या तेलाचा प्रमुख स्रोत असल्याने, या परिस्थितीकडे भारताचे बारकाईने लक्ष आहे.

Updated : 26 March 2026 8:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top