Market-centric Economy: आंतरराष्ट्रीय महिला दिन : उत्सव नव्हे जबाबदारी !
जेव्हा प्रत्येक स्त्री निर्भयपणे, आत्मविश्वासाने आणि अभिमानाने म्हणू शकेल “मी स्वतंत्र आहे, मी सक्षम आहे, आणि माझे अस्तित्व समानतेने मान्य केले जाते.” तेव्हाच समाज प्रगत होईल. महिला दिन साजरा करताना बाजारकेंद्री अर्थव्यवस्थेला खतपाणी न घालता भेदभावमुक्त समाज घडवण्याचा, स्त्रीला दया नव्हे तर सन्मान देण्याचा आणि पुढील पिढीसाठी अधिक न्याय्य व समताधिष्ठित भविष्य निर्माण करण्याचा संकल्प आपण या महिला दिनी करूया- सिरत सातपुते सिरत सातपुते
X
Women freedom and empowerment जगाच्या एकूण लोकसंख्येचा साधारण निम्मा वाटा म्हणजेच 49.7% पृथ्वीतलावर महिलांचा आहे. आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत आहे म्हणजेच तांत्रिकदृष्ट्या निम्म जग महिला दिन साजरा करत आहे. या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आज जगभरात महिला दिन सगळीकडे उत्साहाने साजरा होताना दिसतोय. Market-centric Economy हा उत्साह बाजाराने तयार केलेला कृत्रिम उत्साह आहे हे लक्षात घ्यायला हवे.
Women history and struggle ८ मार्च हा दिवस केवळ उत्सवाचा नाही, तर स्त्रियांच्या संघर्ष, कर्तृत्व आणि समान हक्कांच्या लढ्याची आठवण करून देणारा दिवस आहे हे नव्याने सांगायची आता गरज वाटू लागली आहे इतका हा दिवस बाजारकेंद्री बनवला गेला आहे. जगभरात महिलांनी कामगार हक्क, मतदानाचा अधिकार, शिक्षण आणि सन्मानासाठी दीर्घ संघर्ष केला आहे. त्या संघर्षाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. जगभरात स्त्रियांच्या हक्कांसाठीचे संघटित आंदोलन विशेषतः 19व्या शतकात उभे राहिले. त्या काळात स्त्रियांना मतदानाचा हक्क, शिक्षणाचा अधिकार, संपत्तीवर हक्क आणि समान वेतन यांसाठी लढावे लागले. अमेरिका आणि युरोपमध्ये स्त्रियांच्या मतदान हक्कासाठी मोठे आंदोलन झाले. या आंदोलनामुळे अनेक देशांमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला. या संघर्षामुळे स्त्री-पुरुष समानतेची संकल्पना अधिक बळकट झाली. आज हा दिवस स्त्री-पुरुष समानता, महिला सक्षमीकरण आणि न्यायाच्या मूल्यांची आठवण करून देतो.
मानव प्राण्याच्या उत्क्रांतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत महत्वाचे राहिले आहे. मानवी उत्क्रांतीच्या सुरवातीच्या टप्प्यात समाजरचनेमध्ये महिला अग्रेसर होत्या. मुख्यत्वे मुल जन्माला घालणे आणि शेतीचा शोध या दोन गोष्टींमुळे स्त्रिया पुरुषांपेक्षा वरचढ मानल्या जात होत्या. जगभरातील प्राचीन संस्कृती मातृसत्ता अनुसरताना दिसतात ते यामुळेच.
पुढच्या टप्प्यात चाकाचा शोध लागला. मानवी जीवनात पुरुषांचे महत्व वाढू लागले आणि स्त्री दुय्यम स्थानावर गेली. शेतीसाठीची तिची गरज ही कष्टकरी म्हणूनच राहिली. हे दुय्यम स्थान दीर्घकाळ तसेच राहिले. मानवी प्रगतीच्या विविध टप्प्यावर शिक्षण, मालमत्ता, निर्णयप्रक्रिया, राजकारण आणि सार्वजनिक जीवन या सर्व क्षेत्रांत महिलांवर मर्यादा घालण्यात आल्या. या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध स्त्रियांनी वेळोवेळी संघर्ष उभा केला. हा संघर्ष केवळ स्त्रियांच्या हक्कांसाठीचा संघर्ष नसून तो सामाजिक न्याय, समता आणि प्रतिष्ठेचा संघर्ष आहे.
Women education rights भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास भारतीय समाजात दीर्घकाळ स्त्रियांना अनेक सामाजिक बंधनांना सामोरे जावे लागले. बालविवाह, सतीप्रथा, विधवांवरील अत्याचार, शिक्षणाचा अभाव अशा अनेक समस्या होत्या. या परिस्थितीविरुद्ध समाजसुधारकांनी आणि स्त्रियांनी एकत्रितपणे संघर्ष उभारला. या परिवर्तनाच्या प्रक्रियेत समाजसुधारकांनी मोठी भूमिका बजावली. विशेषतः महात्मा फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. Savitribai Phule women educationसावित्रीबाई फुले यांच्या सोबत त्यांनी 1848 साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या काळात स्त्रियांना शिक्षण देणे हे समाजाला मान्य नव्हते, तरीही त्यांनी प्रचंड विरोधाला तोंड देत स्त्रीशिक्षणाचे कार्य सुरूच ठेवले. फुले दाम्पत्याने शिक्षणाची दारे बहुजनांसाठी आणि स्त्रियांसाठी उघडली आणि पुढील पिढ्यांसाठी मार्ग मोकळा केला. त्यांनी केवळ शाळा सुरू केली नाही, तर अज्ञान आणि अन्यायाविरुद्ध क्रांती घडवली आणि स्त्री-मुक्तीच्या चळवळीला दिशा दिली.
यानंतर महिलांच्या सामाजिक आणि राजकीय सहभागाची प्रक्रिया हळूहळू वाढू लागली. गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढ्यातही महिलांनी सक्रिय सहभाग घेतला. अनेक महिलांनी ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या आंदोलनात नेतृत्व केले. सत्याग्रह, मोर्चे, आंदोलन आणि कारावास या सर्व माध्यमांतून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात आपले योगदान दिले. भारतीय स्वातंत्र्यलढा म्हणूनच हा केवळ पुरुषांचा नव्हता, तर महिलांचाही होता.
स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाने स्त्री-पुरुष समानतेचा अधिकार दिला. शिक्षण, रोजगार, मतदान आणि सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याचा हक्क महिलांना मिळाला. तरीही वास्तवात अनेक सामाजिक आणि आर्थिक अडथळे कायम राहिले. त्यामुळे महिलांच्या हक्कांसाठीच्या चळवळी स्वातंत्र्यानंतरही सुरू राहिल्या. 1970 च्या दशकात भारतात स्त्रीवादी चळवळींना नवीन उभारी मिळाली. महिलांवरील हिंसा, हुंडाबळी, कामाच्या ठिकाणी होणारे शोषण, असमान वेतन आणि लैंगिक भेदभाव यांविरुद्ध अनेक संघटना आणि चळवळी उभ्या राहिल्या. ग्रामीण भागातही महिलांनी पाणी, जमीन, जंगल, रोजगार आणि स्वाभिमानासाठी मोठे संघर्ष केले.
Environment पर्यावरण आणि विकासाच्या प्रश्नांवरही महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली. उत्तर भारतातील चिपको आंदोलन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. Chipko movement या आंदोलनात ग्रामीण महिलांनी जंगलतोड थांबवण्यासाठी झाडांना मिठी मारून आंदोलन केले. या संघर्षामुळे पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला. तसेच मेधा पाटकर यांच्या नेतृत्वा खाली नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून विकासाच्या प्रश्नावर नर्मदा खोऱ्यातील महिला लढल्या आणि विस्थापित कुटुंबाना न्याय मिळाला.
आपल्या देशात आज महिला शिक्षण, उद्योग, विज्ञान, राजकारण, शेती, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांत भरीव कामगिरी करत आहेत. आज महिलांचे आंदोलन अधिक व्यापक स्वरूपात दिसून येते. शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, आर्थिक स्वावलंबन, राजकीय प्रतिनिधित्व आणि लैंगिक समानता या सर्व क्षेत्रांत महिलांचे प्रश्न मांडले जात आहेत. डिजिटल माध्यमे, स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक चळवळींमुळे महिलांचे आवाज अधिक प्रभावीपणे पुढे येत आहेत. तरीही अनेक महिलांना अजूनही असमान वेतन, घरगुती हिंसा, सामाजिक भेदभाव आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते हे वास्तव आहे. ग्रामीण, आदिवासी, दलित, स्थलांतरित आणि एकल महिलांची परिस्थिती तर अधिकच कठीण आहे. त्यामुळे समानता आणि न्याय मिळवण्यासाठी संघर्ष सुरू ठेवणे आवश्यक आहे.
आणि म्हणूनच 8 मार्च हा केवळ शुभेच्छांचा दिवस नाही तर तो इतिहासाची जाणीव करून देणारा, वर्तमानाचे भान देणारा आणि भविष्याची दिशा ठरवणारा दिवस आहे. महिला दिन हा केवळ उत्सव नसून जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे. आजची स्त्री खऱ्या अर्थाने सक्षम तेव्हाच असेल जेव्हा प्रत्यक्षात तिला निर्णयप्रक्रियेत समान सहभाग, शिक्षण व आरोग्याची समान उपलब्धता, हिंसामुक्त व सुरक्षित वातावरण आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळेल.
जेव्हा प्रत्येक स्त्री निर्भयपणे, आत्मविश्वासाने आणि अभिमानाने म्हणू शकेल “मी स्वतंत्र आहे, मी सक्षम आहे, आणि माझे अस्तित्व समानतेने मान्य केले जाते.” तेव्हाच समाज प्रगत होईल. महिला दिन साजरा करताना बाजारकेंद्री अर्थव्यवस्थेला खतपाणी न घालता भेदभावमुक्त समाज घडवण्याचा, स्त्रीला दया नव्हे तर सन्मान देण्याचा आणि पुढील पिढीसाठी अधिक न्याय्य व समताधिष्ठित भविष्य निर्माण करण्याचा संकल्प आपण या महिला दिनी करूया.
Environment,History of Women’s Day, Women education rights, Chipko movement, Market-centric Economy






