India-Iran Relation : इराण आणि भारत….
इराणने पाकिस्तानच्या विरोधात जाऊन भारताची कशी केली मदत? इराणवर अमेरिका-इस्त्रायल हल्ला करत असताना भारताची भूमिका काय असायला हवी? इराण आणि भारताचा इतिहास सांगताहेत लेखक सुनील सांगळे
X
Iran war India reaction आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. हे जरी खरे असले तरीही ज्या देशाने आपल्याला भूतकाळात मदत केली आहे त्याच्याबाबत आपण कृतज्ञ जरी राहिले नाही, तरी निदान तो उध्वस्त होत असताना आपण आनंद तरी मानू नये. इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी एक हुकुमशहा होते, धर्मांध होते, ते अण्वस्त्रे बनवत होते हे आरोप जरी खरे असतील, तरी तसे इतर देश नाहीत काय? सौदी, UAE, आणि मध्य पूर्वेतील सगळेच देश राजेशाही व हुकूमशाही आहेत. धर्मांधतेच्या बाबत Pakistan, Saudi Arabia, the UAE पाकिस्तान, अफगाणिस्तान, इत्यादी काय कमी आहेत? nuclear weapons अण्वस्त्रे पाकिस्तानकडे नाहीत, की कोरियाकडे नाहीत? त्यामुळे अमेरिकेने इराणवर आक्रमण करण्याची ही खरी कारणे नाहीत. खरे कारण म्हणजे इराण हा अमेरिकेच्या ताटाखालील मांजर बनून राहण्यास तयार नाही आणि त्याच्याकडे तेलाचे साठे आहेत हे आहे. तसे Venezuela व्हेनेझुएला कुठे धर्माने होता किंवा त्याच्याकडे कुठे अण्वस्त्रे होते? तरीही त्याच्यावर आक्रमण केलेच ना? खरे तर फक्त तेल आणि मांडलिक म्हणून राहायला तयार नसलेली राजवट हे दोन्ही आक्रमणाच्या मागचे खरे कारण आहे.
भारतातील इस्रायलला आपली Fatherland मानणाऱ्या लोकांना त्या देशाबद्दल फारच प्रेम असते हा आपला इतिहास आहे. त्याचे कारण फक्त एवढेच आहे की तो देश लष्करी ताकदीवर विश्वास ठेवणारा आणि आजूबाजूच्या इस्लामी देशांना ठोकणारा आहे. अगदी युरोपातील देशांपेक्षाही त्यामुळे तो देश आपल्यातील अनेक लोकांचा आदर्श आहे. भले मग ते लोक सुंथा करणारे आणि गोमाता खाणारे का असेनात. त्यामुळे त्यांचा शत्रू इराण, तर मग आपलाही शत्रू इराण; असा हे तर्कट आहे. पण इराणने आपले असे काय वाईट केले आहे? थोडा इतिहास पहिला तर इराणने पाकिस्तानच्या विरोधात जाऊन आपली अनेकदा मदतच केली आहे. उदा.
पाकिस्तानचा 'मास्टर प्लॅन'
१९९४ मध्ये जिनेव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाची (UNHRC) बैठक सुरू होती. पाकिस्तानने काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करणारा एक ठराव मांडला होता. पाकिस्तानचा असा दावा होता की, काश्मीरमध्ये भारतीय सैन्य अत्याचार करत आहे. जर हा ठराव बहुमताने मंजूर झाला असता, तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद भारतावर आर्थिक निर्बंध लादू शकली असती. भारतासाठी ही एक मोठी आंतरराष्ट्रीय नामुष्की ठरली असती.
भारताची 'न भूतो न भविष्यती' रणनीती…
तत्कालीन Narasimha Rao पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी हा प्रश्न पक्षीय राजकारणाच्या पलीकडे नेला. त्यांनी विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांना भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी जिनेव्हाला पाठवले. त्यांच्यासोबत सलमान खुर्शीद आणि फारुख अब्दुल्ला हे देखील होते.
इराणची एन्ट्री आणि भारताची मदत…
Iran helped India against Pakistan जिनेव्हात मतदानाच्या दिवशी वातावरण भारताच्या विरोधात होते. अनेक मुस्लीम देश पाकिस्तानच्या बाजूने मतदान करणार होते. अशा वेळी नरसिंह राव यांनी इराणचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हाशेमी रफसंजानी यांच्याशी वैयक्तिक संपर्क साधला. भारताने मुत्सद्देगिरीने इराणला पटवून दिले की, हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे आणि पाकिस्तान याचा वापर राजकारणासाठी करत आहे. मतदान सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी, इराणच्या प्रतिनिधीने घोषणा केली की, "आम्ही या ठरावावर मतदान करणार नाही आणि आमचा ठरावाच्या मजकुराला विरोध आहे." इराणने घेतलेल्या या भूमिकेमुळे इतर अनेक मुस्लीम देशांमध्ये गोंधळ उडाला. इराणसारख्या मोठ्या इस्लामिक देशाने पाठिंबा काढल्यामुळे पाकिस्तानचा ठराव कोसळणार हे स्पष्ट झाले. आपली नाचक्की टाळण्यासाठी पाकिस्ताने अखेर तो ठराव मतदानापूर्वीच मागे घेतला. या घटनेचे महत्व यासाठी आहे की इराणने पाकिस्तानसारख्या एका इस्लामी देशाविरुद्ध जाऊन भारताला पाठिंबा दिला. तसेच त्यामुळे काश्मीर प्रश्नाचे जागतिकीकरण थांबले. या विजयामुळे काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्रात हस्तक्षेप करण्याची पाकिस्तानची आशा कायमची मावळली. या घटनेनंतर भारताने इराणसोबतचे संबंध अधिक दृढ केले, ज्यामुळे भविष्यात ऊर्जा आणि व्यापाराचे नवे मार्ग उघडले गेले.
२००३ चे तेहरान घोषणापत्र…
बरे काँग्रेसचा काळ जाऊ द्या. २००३ मध्ये जेव्हा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी इराणचा दौरा केला होता, तेव्हा दोन्ही देशांनी 'तेहरान घोषणापत्रावर' स्वाक्षरी केली होती. यामध्ये इराणने काश्मीर हा 'भारताचा अंतर्गत प्रश्न' असल्याचे आणि तो द्विपक्षीय चर्चेतून सुटावा, असे सुचित केले होते.
कलम ३७०:
अगदी आताही २०१९ मध्ये जेव्हा भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवले, तेव्हा तुर्की आणि मलेशिया यांसारख्या इस्लामिक देशांनी भारतावर कडक टीका केली होती. त्या तुलनेत इराणची अधिकृत प्रतिक्रिया खूपच मवाळ होती. इराणने याला भारताचा 'अंतर्गत मुद्दा' म्हणून पाहिले आणि संयम राखण्याचे आवाहन केले होते. असा हा आपल्याशी शेकडो वर्षांचे संबंध असलेला आणि वेळोवेळी आपल्याला मदत करणारा एक देश हडेलहप्पी करणारे दोन देश उध्वस्त करत असताना आपण निदान आनंद तरी साजरा करण्याची गरज नाही. बाकी धर्मांधता वगैरे गोष्टींबद्दल आता आपण फार नाक वर करून बोलण्याची गरजच नाही. आपले घर आपण सांभाळले तरी पुरे झाले.
(साभार -सदर पोस्ट सुनील सांगळे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)






