Home > Top News > Role of Major Candy in Marathi punctuation : मराठी लेखनात इमोजी येऊ नयेत, विरामचिन्हे जपूया !

Role of Major Candy in Marathi punctuation : मराठी लेखनात इमोजी येऊ नयेत, विरामचिन्हे जपूया !

26 फेब्रुवारी विरामचिन्ह दिन आणि 27 फेब्रुवारी मराठी दिन या लागोपाठ येणाऱ्या दिवसांनिमित्त मराठीत विरामचिन्हांचा इतिहास, महत्त्व आणि आजच्या काळातील गरज... यावर लेखक गणेश विसपुते यांचा लेख

Role of Major Candy in Marathi punctuation : मराठी लेखनात इमोजी येऊ नयेत, विरामचिन्हे जपूया !
X

Modi Script Marathi मराठीसाठी मोडी वापरात होती. पण मोडीत विरामचिन्हं नव्हती. अंदाजानं शब्दांच्या वजनावरून भाव ओळखायचा. अनेक भाषांच्या लिप्यांमध्ये विरामचिन्हं नावाचा प्रकार नव्हता. आपण मराठीसाठी मोडीचा त्याग करून Devanagari देवनागरी स्वीकारली. त्यामुळे स्वायत्तता होती तिथं हिंदीचं वर्चस्व स्वीकारल्यासारखं झालं. ते असो. पण प्राचीन चीनी किंवा मायन, जपानी लिप्यांतही विरामचिन्हं नव्हती. तुर्की भाषेच्या लिपीत आजही ती नाहीत. ओरहान पामुकची भाषांतरकर्ती म़ॉरीन फ्रीली हिनं भाषांतर करताना त्यामुळे किती दमछाक होते हे एका मुलाखतीत विस्तारानं सांगितलं आहे. ब्राह्मी लिपीत विरामचिन्हांचा काही अंशी वापर दिसतो. महानुभाव ११-१२ व्या शतकांत पूर्णविरामाऐवजी विसर्ग वापरत. हिंदीत अलीकडे काही काळापर्यंत संस्कृतप्रमाणे वाक्याच्या अखेरीला दंड देण्याची पद्धत होती.

Marathi Punctuation History रेनेसान्सच्या थोडं पूर्वी, बायबलच्या हस्तलिखित प्रती लिहिताना, भाषांतरित करताना काही चिन्हं विकसित झाली. जगभर वेगवेगळ्या ठिकाणी- भिन्न प्रकारे चिन्हं वापरली जाऊ लागली. पण मुद्रण क्रांतीनंतर त्यात सूसुत्रता यायला सुरुवात झाली. मराठीसाठी हे करण्याचं काम अर्थात Major Candy मेजर कॅन्डी यांचं आहे. ते १९ व्या शतकाच्या मध्याला सुरु झालं. हे खरंच आहे की विरामचिन्हांमुळे आशयाच्या आकलनात सुस्पष्टता आली. कितीतरी गोष्टी सोप्या झाल्या. लेटरप्रेसवर जेव्हा मुद्रण व्हायचं तेव्हा प्रेसमध्ये मुद्रितशोधनाचे तक्ते लटकावलेले दिसत. लिहिणाऱ्यांना स्वतःचं लेखन तपासताना आजही त्याचा उपयोग होऊ शकतो. काळजी घेऊन लिहिणारे (लेखकच नव्हे, साधं पत्रही लिहिणारे) कमी झालेले आहेत. अति तंत्रज्ञानाचा तो फटिगही असेल. पण असं लिहिलेलं वाचताना वाईट वाटतं. कारण भाषा शिकूनच शिकता येते. शिकत राहावी लागते.

तर मुद्रितशोधनाच्या तक्त्यांत 'एन् डॅश टाका', 'एम् डॅश टाका', 'थ्री एम् डॅश टाका' असंही होतं. आता कळफलकावर एम् डॅश नसतो. तो कुठून तरी इन्सर्ट करावा लागतो. शिवाय मागच्या तीसेक वर्षांत नवी विरामचिन्हं पाश्चात्य भाषांमध्ये आलेली आहेत. त्यांना भारतीय भाषांमध्ये यायला बहुधा वेळ लागेल. Emojis तोवर मेसेजेस मधल्या इमोजींची चिन्हं लेखनात येऊ नयेत ही प्रार्थना करू.

विरामचिन्ह_दिन

Updated : 27 Feb 2026 1:57 AM IST
Next Story
Share it
Top