Home > News Update > Live: 'सबका प्रयास, सबका कर्तव्य' :द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ

Live: 'सबका प्रयास, सबका कर्तव्य' :द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ

द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली

Live: सबका प्रयास, सबका कर्तव्य :द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ
X

द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली.

त्यानंतर देशाच्या नव्या राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी देण्यात आली.त्यानंतर राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू देशाला उद्देशून पहिलं भाषण केलं. या सोहळय़ाला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, खासदार आदी उपस्थित होते.

आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना मला ही संधी मिळाली आहे. देश आपल्या स्वातंत्र्याची ५० वर्ष साजरी करत असताना, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली होती. आज ७५ व्या वर्षात मला ही नवी संधी मिळाली आहे. २५ वर्षाचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत असताना ही जबाबदारी मिळणं माझं सौभाग्य आहे, असं सांगत द्रौपदी मुर्मू यांनी सर्व आमदार, खासदार तसंच देशवासियांचे आभार मानले.

स्वतंत्र भारतात जन्म झालेली मी पहिली राष्ट्रपती आहे. पुढील २५ वर्षात आपल्याला 'सबका प्रयास, सबका कर्तव्य' या दोन मार्गांवर वाटचाल करावी लागणार आहे असं आवाहन द्रौपदी मुर्मू यांनी केलं.

"मी जिथून आलो ते ठिकाण म्हणजे अगदी प्राथमिक शिक्षण हे देखील स्वप्न आहे. गरीब, मागासलेले मला त्यांचे प्रतिबिंब दाखवतात. मी भारतातील तरुण आणि महिलांना खात्री देतो की या पदावर काम करताना माझ्यासाठी त्याचे प्रश्न त्यांच्यासाठी काम करणे सर्वोपरी असेल.

"देशातील महिला, मुली जास्तीत जास्त सक्षम झाल्या पाहिजेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी योगदान दिलं पाहिजे. तरुण फक्त आपलं भविष्य निर्माण करत असून देशाच्या भविष्याचा पायाही रचत आहेत. माझं तुम्हाला नेहमी पाठिंबा असेल," असं आश्वासन मुर्मू यांनी दिला.

संसदेत माझी उपस्थिती भारतीयांच्या आशा आणि हक्कांचे प्रतीक आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. तुमचा विश्वास आणि पाठिंबा मला नवीन जबाबदारी घेण्याचे बळ देत आहे.स्वतंत्र भारतात जन्मलेला मी पहिला राष्ट्रपती आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी भारतीयांवर ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.

राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणे हे माझे वैयक्तिक कर्तृत्व नसून देशातील सर्व गरिबांचे ते यश आहे. माझे नामांकन हा पुरावा आहे की भारतातील गरीब केवळ स्वप्ने पाहू शकत नाहीत, तर ती स्वप्ने पूर्णही करू शकतात.

"आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी नागरिकांकडून ज्या अपेक्षा केल्या आहेत, त्याची पूर्तता करण्यासाठी गतीने काम करावं लागणार आहे. 'सबका प्रयास, सबका कर्तव्य' या मार्गावर वाटचाल करावी लागणार आहे. भारताच्या उज्वल भविष्याचा प्रवास सर्वांच्या सोबतीने करायचा आहे," असं आवाहन द्रौपदी मुर्मू यांनी केलं.

"ओडिशामधील छोट्याश्या आदिवासी गावातून माझा प्रवास सुरु झाला होता. तिथे प्राथमिक शिक्षण मिळणंही स्वप्नाप्रमाणे होतं. पण अनेक अडथळ्यांनंतरही मी संकल्प सोडला नाही. कॉलेजमध्ये जाणारी माझ्या गावातील मी पहिली व्यक्ती होती," असं मुर्मू यांनी सांगितलं.

"वॉर्ड काऊन्लिसर ते देशाच्या राष्ट्रपती होण्याची संधी मला मिळाली आहे. ही भारताची महानता असून लोकशाहीची ताकद आहे. यामुळेच एका गरिब घरातील जन्मलेली मुलगी देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकते. राष्ट्रपती होणं माझं वैयक्तिक यश नसून हे भारतातील प्रत्येक गरिबाचं यश आहे. भारतात गरीब स्वप्न पाहू शकतो आणि पूर्णही करु शकतो हेच यामधून सिद्ध होत आहे. अनेक वर्ष सुविधांपासून वंचित राहिलेल्या दलित, गरीब आदिवासी माझ्यात आपलं प्रतिबिंब पाहू शकतात," असंही द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं.

देशातील गरिबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. देशातील करोडो महिला आणि मुलींच्या स्वप्न आणि सामर्थ्याची झलक आहे असंही मुर्मू यांनी सांगितलं. प्रगतशील भारताचं नेतृत्व करताना मला अभिमान वाटत आहे. सर्व देशाविसायांना आणि खासकरुन तरुण, महिलांना आश्वस्त करु इच्छिते की, त्यांच्या हिताला प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन मुर्मू यांनी दिलं आहे.

"भारत आज प्रत्येक क्षेत्रात विकास करत आहेत. करोना काळात भारताने जे सामर्थ्य दाखवलं, त्यामुळे संपूर्ण जगाला आपल्यासोबत पुढे नेण्याचं काम केलं. आपण भारतीयांनी आपल्या प्रयत्नांनी फक्त जागित संकटाचा सामना केला, तर जगासमोर नवे मापदंडही ठेवले. काही दिवसांपूर्वी आपण २०० कोटी डोस देण्याचा विक्रम केला आहे. या संपूर्ण लढाईत भारताने दाखवलेला संयम, साहस आपली शक्ती आणि संवदेनशीलतेचं प्रतीक आहे. भारताने जगालाही मदत केली. आज जग भारताकडे नव्या विश्वासाने पाहत आहे," असं गौरवौद्गार द्रौपदी मुर्मू यांनी काढले.देशाला राष्ट्रपतीपदाची मोठी परंपरा असून मी पूर्ण निष्ठेने कर्तव्याचं पालन करेन. सर्व देशवासीय माझ्या ऊर्जेचे स्तोत्र असतील," असं प्रतिपादन मुर्मू यांनी केलं.

Updated : 25 July 2022 10:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top