Home > Top News > Power Beyond Weapons : एकच कृती, दोन मानसिकता: सैनिकांचे तत्त्व आणि गुंडांची दादागिरी

Power Beyond Weapons : एकच कृती, दोन मानसिकता: सैनिकांचे तत्त्व आणि गुंडांची दादागिरी

सैनिक शस्त्र उचलतो ते कर्तव्य, संयम आणि जबाबदारीची जाणीव घेऊन; गुंड शस्त्र मिरवतो तो भय, अहंकार आणि दादागिरीसाठी. कृती अनेकदा सारखी दिसू शकते मात्र शस्त्रापलीकडील सामर्थ्याच्या दिशा वेगळ्या असतात... यासंदर्भात माजी लष्करी अधिकारी कॅप्टन स्मिता गायकवाड यांचा लेख

Power Beyond Weapons :  एकच कृती, दोन मानसिकता: सैनिकांचे तत्त्व आणि गुंडांची दादागिरी
X

Military ethics and discipline 2015 मधली घटना. Tral encounter 2015 त्राल मध्ये 44 राष्ट्रीय राइफल चे कमांडिंग अधिकारी Colonel MN Rai कर्नल एम एन राय ह्यांना हिजबुल मुजाहिदीन च्या दहशतवाद्यांविरोधात झालेल्या एका चकमकीत वीरगती प्राप्त झाली.


ज्या घराला वेढा घातला होता त्या घरात दोन दहशतवादी आहेत ही पक्की माहिती होती. वेढा घातल्यावर त्या घरातून त्या दहशतवाद्याचे वडील बाहेर आले आणि त्यांनी मुलगा शरण यायला तयार असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला आणि त्यानीही त्याच गोष्टीची पुनरुक्ती केली. कर्नल राय ह्यांनी त्या दहशतवाद्यांना शरण येण्याची संधी दिली. त्याबाबत चर्चा चालू असतानाच दोन्ही दहशतवाद्यांनी घरातून बाहेर येत गोळीबार सुरू केला. कर्नल राय आणि त्यांच्या टीमनी प्रसंगावधान दाखवून लगेच retaliatory firing केली. ज्यात दोन्ही दहशतवादी मारले गेले. परंतु त्या चकमकीत कर्नल राय आणि एका पोलीसाचा मृत्यू झाला. ह्या घटनेच्या एक दिवस आधीच २६ जानेवारीला कर्नल राय ह्यांना त्राल मधील कामगिरीसाठी युद्ध सेवा मेडल घोषित झाले होते. नंतर त्यांना मरणोत्तर शौर्य चक्रानी Shaurya Chakra awardee गौरवण्यात आलं.

कर्नल राय ह्यांचं मूळ यूनिट २/९ Gorkha Rifles bravery गोरखा राइफल (2/9 GR) होतं. मी आर्मीत कोअर ऑफ इंजीनियर्समध्ये असताना पहिलं पोस्टिंग आसाममध्ये होतं. माझी कंपनी ज्या ब्रिगेडला सपोर्ट देत होती, 2/9 GR त्या ब्रिगेडचा भाग होती. 2/9 GR बरोबर भारत चीन सीमेवर अरूणाचल प्रदेशातल्या forward area मध्ये एक महिना मी माझ्या रेजिमेंटची दहा जणांची टीम घेऊन op recce चं काम केलं होतं. शिवाय आसाममध्ये op works, flood relief अशा विविध कामानिमित्त माझं त्यांच्या युनिट मध्ये जाणं येणं सातत्यानं होतं. कर्नल राय ह्यांच्या मृत्यूचं दुःख त्यामुळे माझ्यासाठी केवळ comrade in uniform गमावल्याचं नव्हतं तर वैयक्तिक होतं.


कर्नल राय ह्यांचे अंत्यसंस्कार जेव्हा सगळ्या टीव्ही चॅनेलवर दाखवले जात होते आणि त्यांच्या मुलीनी, अलकानी दिलेला गोरखा बटालियन चा war cry ऐकला. तेव्हा मन हेलावून गेलं. Counter insurgency area मध्ये सोबत काम करताना पहाडासारखे निश्चल असलेले अनेक चेहरे तिथे अश्रू पुसताना पाहून असह्यं झालं. अनेक दिवस अश्रू वाहत राहिले. दोन एक दिवसांनी संपर्कातल्या 2/9 GR च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झालं. त्यांची पत्नी आणि कर्नल राय ह्यांची पत्नी जिवलग मैत्रिणी होत्या आणि त्यांच्या मुलांची सुद्धा मैत्री होती. मी त्यांना बोलता बोलता उद्वेगानं म्हंटलं Armed forces moral values “कर्नल रायनी दहशतवाद्यांना शरणागतीचा पर्याय नाकारला असता तर कदाचित आज ते जिवंत असते. ” त्या माझ्या वाक्यावर स्वतः भावनिक असतानाही तत्काळ मला थांबवून त्यांनी समजावलं- “ ऐसा नही होता।He did the right thing. Institutions crumble if institutional values are compromised. He upheld values of Indian Armed Forces at the cost of his life.” त्यांचं हे वाक्यं कायमचं मनावर कोरलं गेलं. दहशतवाद्यांचा शरणागतीचा अधिकार (Righ to surrender) आणि भारतीय सैन्याची तत्वं जपत असताना कर्नल रायना प्राण गमवावे लागले होते.

दुसरा प्रसंग. जुलै २०२३ मधली घटना. सकाळी साधारण १०.३०-११ च्या दरम्यान मला कर्नल वाय कें चा फोन आला. “आपल्या दोन गाड्यांवर हल्ला झालाय. कर्नल एसएस हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी साठी पुण्यात admit आहेत. त्यामुळे परिस्थिती सांभाळायला जावं लागेल. तुला जायला जमेल का?“ मी त्यावेळी भोपाळला होते. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातल्या एका कंपनीत मध्य प्रदेश मधील साइट्सची Business Assurance ची जबाबदारी माझ्याकडे होती. कर्नल वाय के तिथे Business Assurance चे राष्ट्रीय प्रमुख होते आणि सगळे राज्याचे प्रमुख त्यांना report करत असत. गाड्यांवर जो हल्ला झाला होता ती घटना कोणत्या Counter insurgency किंवा नक्षलग्रस्तं भागातली नव्हती. बीड जिल्ह्यातली होती. राजकीय वरदहस्तं असलेल्या स्थानिक गुंडाला कंपनीकडून कंत्राट न मिळाल्याने त्यानी केलेला तो उद्योग होता. “मला घरी जाऊन बॅग पॅक करायला एक तास लागेल. त्यानंतर पहिल्याच flight नी मी निघेन” असं कर्नल वाय केंना सांगून मी ऑफिस मधून बाहेर पडले. बीडला जाऊन पुढच्या दोन तीन दिवसात मी ते प्रकरण निस्तरलं. त्या गुंडाच्या विरोधात FIR करून भीतीमुळे साइट वर जायला तयार नसलेल्या इंजीनियर्सला विश्वास देत काम सुरु करण्यापर्यंत सगळे सोपस्कार पार पाडले. त्या घटनेनंतर मला महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली. महाराष्ट्रातल्या वीस साइट पैकी आठ साइट मराठवाड्यात होत्या आणि माझा कामातला जवळजवळ ९०% वेळ ह्या मराठवाड्यातल्या साइट्सला द्यावा लागायचा.

भारतात अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये पवनचक्की किंवा सौर ऊर्जेच्या साईट उभ्या करताना आणि चालवताना स्थानिक गुंडांची मुजोरी, पोलीस आणि प्रशासनातील भ्रष्टाचार, स्थानिक राजकारण्यांची दादागिरी, त्या राजकारण्यांच्या कार्यकर्त्यांची मुजोरी, कॉपर केबल च्या चोरीमुळे करोडोंचं नुकसान, भावकी आणि गावकीतले वाद, कर्मचाऱ्यांवर गुंडांचे हल्ले अशा असंख्य गोष्टींना सामोरं जावं लागतं. महाराष्ट्र राज्य ह्या sector मध्ये अशा गोष्टींमध्ये अग्रेसर आहे. ह्या सगळ्या गोष्टी निस्तरण्यासाठी कंपन्या आर्मीतील निवृत्त अधिकारी आणि जवानांना घेतात. माझ्या महाराष्ट्राच्या टीममध्ये मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट आणि पॅरा रेजिमेंटचे निवृत्त JCO आणि NCO होते. खंडणीसाठी किंवा कंपनीकडून कंत्राट मिळावं म्हणून धमक्या, चुकीच्या गोष्टींसाठी कोणाला नोकरीवरून काढल्यावर साईटला घेराव आणि राजकारण्यांचे फ़ोन, अपहरण, मारामाऱ्या, रस्ते अडवणं, गाड्या फोडणं अशा असंख्य घटना आमच्यासाठी रोजच्या असायच्या. वेळी-अवेळी घडणाऱ्या घटना आणि त्यासाठी येणारे फोन म्हणजे ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशी परिस्थिती होती. एकदा तर बीडवरून पुण्याला येताना रात्री ११ च्या जवळपास नगरला जेवायला थांबले आणि कंपनीच्या बीडच्या हॉस्टेलवर स्थानिक गुंडानी हल्ला केल्याचा फोन आला म्हणून गाडी वळवून पुन्हा एक दीडच्या सुमारास बीडला पोहोचले. फोन वाजला की सुरवातीला टेन्शन यायचं की आता काय नवीन असेल? नंतर अपहरणाच्या घटनासुद्धा सवयीच्या झाल्या. संतोष देशमुख खून प्रकरण हे हिमनगाचं टोक होतं. मराठवाड्यात लोकशाही आणि कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का ? हा प्रश्न सातत्याने पडेल अशा घटना मी आणि माझी टीम रोज अनुभवत होतो. जणू काही ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’ चा लाइव शो आमच्या आजूबाजूला रोज घडत होता.

एकदा मराठवाड्यातील एका साईटच्या टीम बरोबर दुपारी जेवायला तिथल्या होटेलमध्ये गेलो होतो. माझ्या टीममधला तिथला Site Head निवृत्त Para Commando होता. माझ्या टीमचा सगळ्यात जास्त efficient आणि effective माणूस. आम्ही पाच सहा जण जेवायला बसलो असताना तिथला एक स्थानिक गुंड तिथून जेवून बाहेर पडताना दिसला. त्याच्या राजकीय महत्वाकांक्षा त्याच्या कुवतीपेक्षा फारच जास्तं होत्या. पांढरे सफेद कपडे, गॉगल आणि कमरेला पिस्तुल लावून तो फिरायचा. सोबत त्याच्याच कुवतीची चार पाच टाळकी पण असायची. मराठवाड्यात तसंही लग्नात लाडू वाटतात तसे शस्त्र परवाने वाटलेले असल्याने कोणीही सोम्यागोम्या उठसूठ शस्त्र कमरेला लावून फिरत असतो. आम्हाला तिथे पाहून तो एक दोन मिनिट आमच्या टेबलपाशी येऊन बोलला आणि मग बाहेर पडला. तो गेल्यावर त्याच्या शस्त्रावरून बोलणं चालू होतं. माझ्या टीमच्या पॅरा कमांडोकडे सुद्धा परवाना असलेलं वैयक्तिक शस्त्र होतं. ते तो शक्यतो सोबत नाही बाळगायचा किंवा सोबत ठेवण्याची वेळ आली तरी ते नजरेस पडेल असं ठेवलेलं नसायचं. तो गुंड तिथून बाहेर पडल्यावर आमच्या सोबत असलेल्या टेक्निकल टीममधल्या विशीतल्या एका तरुणानी माझ्या टीमच्या पॅरा कमांडोला जोशमध्ये म्हंटलं “तुम्ही पण त्याच्यासारखं कमरेला बंदूक लावून स्टाइल मारायला पाहिजे.” त्यावर आमच्या पॅरा कमांडोचं उत्तर होतं - “तो छपरी आहे. मी फौजी आहे. मी भारतीय सैन्यात आयुष्यभर देशासाठी शस्त्रं चालवली आहेत. असला देखावा करायची मला गरज नाही. हम दोनो के उसूलोंमें फर्क है।” Indian Army values and principles

त्याचं उत्तर ऐकून मला पुन्हा एकदा कर्नल राय आणि 2/9 GR च्या माझ्या वरिष्ठं अधिकाऱ्यांचे शब्द आठवले. Soldier vs gangster difference कृती एकच - शस्त्रं धारण करण्याची. परंतु, फरक असतो ते धारण करणाऱ्याच्या मानसिकतेचा, संस्कारांचा आणि तत्वांचा. सैनिक शस्त्र उचलतो ते कर्तव्य, संयम आणि जबाबदारीची जाणीव घेऊन; गुंड शस्त्र मिरवतो तो भय, अहंकार आणि दादागिरीसाठी. कृती अनेकदा सारखी दिसू शकते, पण तिच्यामागची जाणीव, जबाबदारीची भावना आणि शिस्त यांचं वजन वेगळं असतं. शेवटी केवळ सामर्थ्य निर्णायक ठरत नाही, तर त्या सामर्थ्याला दिशा देणारं विवेकबुद्धीचं आणि कर्तव्याचं अधिष्ठान निर्णायक ठरतं.


Colonel MN Rai heroism, Power beyond weapons meaning, Soldier vs gangster mindset, Indian Army values and principles, Tral encounter 2015, Rashtriya Rifles operation, Hizbul Mujahideen encounter, Shaurya Chakra awardee, Yudh Seva Medal recipient, Gorkha Rifles bravery, Indian Army sacrifice stories, Counter insurgency operations India, Military ethics and discipline, Armed forces moral values, Soldier responsibility vs criminal power

Updated : 28 Feb 2026 4:38 PM IST
author-thhumb

कॅप्टन स्मिता गायकवाड

(Ex Indian Army officer) भारतीय लष्कराच्या माजी अधिकारी आहेत. तसेच नक्षलवाद आणि 'अर्बन माओवाद' या विषयाच्या अभ्यासक आहेत.


Next Story
Share it
Top