Home > मॅक्स ब्लॉग्ज > माझा सहोदर सखा वाट्याडा बुध्द

माझा सहोदर सखा वाट्याडा बुध्द

प्रत्येकामध्ये पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्णत्व दडलेले आहेच', असे विवेकानंद म्हणाले, तो प्रभाव बुद्धांचाच तर होता. 'बुद्धं सरणं गच्छामि' म्हणजे अन्य काही नाही. स्वतःला शरण जा, हाच त्याचा अर्थ. "कोणी काही सांगेल, म्हणून विश्वास ठेऊ नका. उद्या मीही काही सांगेल. म्हणून ते अंतिम मानू नका. पिटकात एखादी गोष्ट आली आहे, म्हणून विश्वास ठेऊ नका", असं म्हणाले बुद्ध.. याविषयी अभ्यासक विकास मेश्राम यांचा लेख बुध्द पौर्णिमेनिमीत्त पुनः प्रकाशित करीत आहोत.

माझा सहोदर सखा वाट्याडा बुध्द
X

"बुध्द आयुष्याच्या वाटेवर मिळाला नसता तर आयुष्य खूप भरकटत गेले असते, माझ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे बुध्दच देतो, नाही तर आयुष्य कुठल्या ना कुठल्या वळणावर गेले असते,सांगतो मला अत् दिप भव, तु तुझाच मार्गदाता हो, स्वयं प्रकाशित हो,बुध्दाने सांगीतले महान ञिकालबाधीत सत्य ते सत्य म्हणजे दुःख आहे, दुःखाची कारणे आहेत, दुःख मुक्तीचे उपाय आहेत, ते दुःखाचे उगम तृष्णेत आहे.आणि सांगतो की मध्यम मार्ग आहे आणि मी पकडण्याचा प्रयत्न करतोय मध्यम मार्ग अती हवे अन् काही नको याच्यातील विवेकबिंदू,सांगतो प्रत्येक गोष्ट विवेकावर तर्कावर सत्याच्या कसोटी वर पारखून बघ, ही बदल हा नियम सांगतोय बुध्द म्हणून मला जवळचा वाटतो,

तथागत गौतम बुद्धांएवढा बुद्धिमान, प्रगल्भ, परिपूर्ण माणूस जगाने आजवर पाहिलेला नाही. बुद्धांच्या सामर्थ्याचा एक थेंब माझ्याकडे असता, तरी खूप झाले असते! एवढा थोर तत्त्वचिंतक कोणीच आजवर बघितला नाही.असा शिक्षक यापूर्वी कधी होऊन गेला नाही. काय सामर्थ्य होते पाहा.जुलमी ब्राह्मणांच्या सत्तेसमोरही हा माणूस वाकला नाही. उभा राहिला.तेवत राहिला

भारताची जगभरातली खरी ओळख आजही 'बुद्धांचा देश' हीच आहे. भलेही त्यांचे जन्मगाव असणारे लुंबिनी आता नेपाळमध्ये असेल, पण बुद्ध आपले आणि आपण सारे बुद्धांचे.

'बुद्धांशी तुलना होईल, असा एकही माणूस नंतर जन्मलाच नाही'

बुद्ध थोर होतेच, पण बुद्धांची खरी थोरवी अशी की, आपण प्रेषित असल्याचा दावा त्यांनी कधी केला नाही., बुद्ध हे या इतरांप्रमाणे प्रेषित नव्हते. स्वतःला परमेश्वर मानत नव्हते. मला सगळं जगणं समजलंय, असा त्यांचा दावा नव्हता. मीच अंतिम आहे, असे बुद्ध कधीच म्हणाले नाहीत. "अन्य धर्मसंस्थापकांनी लोकांना कर्मकांडाची चाकोरी दिली. त्या चाकोरीने बांधून टाकले. तथागतांचा धम्म ही विचारांची चाकोरीबद्ध मांडणी नव्हती. चाकोरी तोडून मुक्त करणारा धर्म बुद्धांनी सांगितला." धर्म आणि धम्मा मधील मुलगामी फरक सांगीतला.

'प्रत्येकामध्ये पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्णत्व दडलेले आहेच', असे विवेकानंद म्हणाले, तो प्रभाव बुद्धांचाच तर होता. तुम्ही सगळं जग ओळखलं, पण स्वतःला ओळखलं नाही. म्हणून तर स्वतःला शरण जा, असे तथागत म्हणाले. 'बुद्धं सरणं गच्छामि' म्हणजे अन्य काही नाही. स्वतःला शरण जा, हाच त्याचा अर्थ. "कोणी काही सांगेल, म्हणून विश्वास ठेऊ नका. उद्या मीही काही सांगेल. म्हणून ते अंतिम मानू नका. पिटकात एखादी गोष्ट आली आहे, म्हणून विश्वास ठेऊ नका", असं म्हणाले बुद्ध.

जगातला एक धर्म सांगा, एक धर्मसंस्थापक सांगा, की जो स्वतःची अशी स्वतःच चिरफाड करतो! चिकित्सेची तयारी दाखवतो!

'भक्त' वाढत चाललेले असताना, विखार ही मातृभाषा होत असताना आणि 'व्हाट्सॲप फॉरवर्ड' हेच ज्ञान झालेलं असताना बुद्धांचा हा दृष्टिकोन आणखी समकालीन महत्त्वाचा वाटू लागतो.

माणूस बदलतो, यावर बुद्ध विश्वास ठेवतात. कोणीही मानव बुद्ध होऊ शकतो, याची हमी देतात. मात्र, स्वतःला शरण जा, हीच पूर्वअट सांगतात.

बुद्ध जगात दुःख आहे, हे मान्य करतात. पण दुःखावर मात करण्याचं बळ देतात. दुःख आहे, हे समजायला तर हवंच. मग त्याचं स्वरूप शोधायला हवं, अशा वाटेनं जात तुमच्या आयुष्यात बुद्ध आनंदाची उधळण करतात. जन्मापूर्वी काय आणि मृत्यूनंतर काय, अशा कोणत्याही हुबासक्या न मारता, बुद्ध जीवनाविषयी बोलतात. जगण्याविषयी बोलतात. त्यातला प्रत्येक पदर उलगडून दाखवतात. अगदी झोपेवर बोलतात आणि आहारावरही. मैत्रीवर बोलतात आणि संसारावरही. आधुनिक मानसशास्त्रज्ञांनाही बुद्ध थक्क करतात. मनाची गुपितं उघड करतात आणि मानवी मनाचं विश्वरूपदर्शन घडवतात.

बुद्ध तपस्वी होते . ते विलक्षण संघटकही होते. अमोघ वक्ते होते. अभिव्यक्तीची अनेक माध्यमे त्यांनी प्रातिभ शैलीने हाताळलेली दिसतात. हातात तलवार न घेता बुद्धांनी जगावर माणसांच्या मनावर राज्य केले. अशोकासारखे जगज्जेते सम्राटही बुद्धाच्या वाटेने चालू लागले. तेही त्या काळात. (इ.स.पू ६२३ – ५४३ हा बुद्धांचा काळ मानला जातो. ८० वर्षांचे आयुष्य बुद्ध जगले.) बुद्धांनी संघ स्थापन केला. संघामुळेच धम्म जगभर पोहोचला. बुद्धांचे अपहरण करणा-यांनी बुद्धाला विष्णूचा अवतार तर केलेच, पण पुढे 'संघ' हा शब्दही चोरला. बुद्धांना 'भगवान' म्हणतात, ते 'भगवा' यावरून आले आहे. पण, या भगव्या रंगाचेही अपहरण झाले. माणूस मोठा झाला की त्याचे अपहरण करायचे, पण त्याच्या विचारांच्या विपरित वागायचे! हा डाव कळला नाही, म्हणून बुद्धाचेही बोट आपण सोडले. बुद्धांच्या निधनानंतर चारशे वर्षांनी 'मनुस्मृती' येते, याची आणखी कारणपरंपरा कोणती सांगणार?डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला पुन्हा ख-याखु-या बुद्धाची वाट दाखवली. प्रज्ञा, शील, करूणा आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता सांगणारा- 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' सांगणारा बुद्ध बाबासाहेबांना प्रकाशमान करणे अगदीच स्वाभाविक होते. बुद्ध म्हणजे असा प्रकाश आहे, जो अनुभवता येतो. भरून घेता येतो, असे बाबासाहेब सांगतात.

बुद्धाचे खरे वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो. आणि, मुख्य म्हणजे, त्याला शोधायला कुठे हिमालयात जावे लागत नाही. अगदी बाहेरच्या चौकात बुद्ध भेटतो.

बुद्ध बाहेर भेटत असला, तरी तो असतो तुझ्या-माझ्या मनात.गोंधळलेल्या अर्जुनाला साक्षात परमेश्वर विश्वरूपदर्शन देतात. परमेश्वराला शरण ये, असे सांगत स्वतःच्या दैवी प्रकाशाने थक्क करतात. मग, युद्धाचा मार्ग सांगतात. इथे मात्र गोंधळलेल्या अर्जुनांना 'तू स्वतःलाच शरण जा. तुझ्यातला प्रकाश तुला सापडेल', असे समजावत बुद्ध युद्धाची नव्हे, तर शांतीची- प्रेमाची दिशा दाखवतात.

बुद्ध का जवळचा वाटतो ?कारण बुद्ध प्रश्न विचारायला सांगतो, तेही स्वतःला आणि उत्तर शोधायला प्रवृत्त करतो, तुम्हाला तुमच्या धडावर असलेलं डोकं वापरायला सांगतो.

" मी सांगतो म्हणून नाही तर मी जे सांगतो ते किंवा जे कुणीही सांगेल ते तुमच्या तर्काच्या ,बुद्धीच्या कसोटीवर घासून पहा आणि पटल तरच स्विकारा "

मी परमेश्वर आहे आणि माझ्या पायावर डोस्की आपटली कि मी तुम्हाला मोक्ष देतो असला काहीही भंपकपणा न करणारा हा धर्म संस्थापक वेगळाच.

बुद्धाने कोणत्याही व्यक्तीचा द्वेष केला नाही तर प्रेमाचं तत्वज्ञान सांगितलं.आपल्याला आपल डोक वापरायला सांगतो म्हणून आपल्याला बुद्ध जवळचा वाटतो आणि त्याला समजून घ्यायला त्याच्या प्रतिमेची भव्यता आडवी येत नाही ना तीच दडपण येत.बुद्ध कायमच अस हाताला धरून चालवणाऱ्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत सगळीकडं भेटतो.

काळाच्या ओघात आम्ही त्याच्याही मूर्ती बनवून त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध देवत्व देऊन टाकल हा भाग वेगळा.

ज्यांना बुद्धाच तत्वज्ञान आणि आपल्या बुद्धीचा वापर अडचणीचा वाटला त्यांनी त्याला थेट विष्णूचा अवतार बनवून टाकला.

तरीही ह्या सगळ्यांना पुरून उरला तो बुद्ध.

मेंढर बनू नका, माना डोलावणारे नंदीबैल बनू नका तर विचार करणारी माणस बना हे बुद्ध आपल्या कृतीतून सांगतो.

म्हणूनच आज सगळ्यात जास्त बोधकथा सांगितल्या जातात त्या बुद्धाच्या ज्यात माणसांच्या जगण्याच तत्वज्ञान असतय.

बुद्ध जवळचा वाटतो तो ह्यासाठी.

बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे, संपन्न शेतकरी कुटुंबातला हा सिद्धार्थ.

आपल्यासारखाच गोंधळलेला सिद्धार्थ 'बुद्ध' होऊ शकतो. तर, तू का नाही? मी का नाही?

व्यवस्थेला शरण जाणारे तू नि मी स्वतःला शरण का जात नाही?

गृहत्यागानंतर सिद्धार्थला समजले, ते बुद्ध सोबत असताना गृहवासात आपल्याला का समजणार नाही?

आजचा दिवस आहे, हाच प्रश्न या गृहवासात स्वतःला विचारण्याचा.

'अत्त दीप भव' हाच तर 'पासवर्ड' आहे 'बुद्ध' होण्याचा!

कधी, सखा, प्रियकर, सहोदर, कधी मित्र..

माझ्या पेशीत भिनल्या गेला बुध्दाचा अंश किती सुंदर बरे वाटेल…!

विकास परसराम मेश्राम

[email protected]

Updated : 16 May 2022 10:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top