Home > Top News > BJP's Masterstroke in Mumbai : मुंबई अधिकृतपणे शिवसेनेच्या हातातून गेली यावर शिक्कामोर्तब !

BJP's Masterstroke in Mumbai : मुंबई अधिकृतपणे शिवसेनेच्या हातातून गेली यावर शिक्कामोर्तब !

भाजपनेही मास्टरस्ट्रोक मारत काँग्रेसमधून २०१२ मध्ये पक्षप्रवेश केलेल्या रितू तावडे यांना महापौर बनवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसयुक्त भाजपाचा हा प्रवास ही अचंबित करणारा आहे. हळूहळू हद्पार होत चाललेली शिवसेना आणि मुंबईच्या राजकारणाची बदलती समीकरणे यावर रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण

BJPs Masterstroke in Mumbai : मुंबई अधिकृतपणे शिवसेनेच्या हातातून गेली यावर शिक्कामोर्तब !
X

BJP's Rise in Mumbai Politics मुंबईत शिवसेनेचा Shiv Sena महापौर Mayor असावा अशी सर्वसामान्य भावना असते, याच भावनेभोवती Mumbai मुंबईचं राजकारण Politics फिरत आलं होतं. शिवसैनिकांना आपल्या हातातून एक आंतरराष्ट्रीय शहर गेल्याचं त्यानंतर मुंबई अधिकृतपणे शिवसेनेच्या हातातून गेली यावर शिक्कामोर्तब झालं. मुंबईसाठी एकनाथ शिंदे कधीही आग्रही राहिले नाहीत, त्यांनी आक्रमक प्रचार ही केला नाही. जास्त जागा येऊनही राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावेळी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं याचा आधार घेऊनही मुंबईची मागणी केली नाही. याचा सरळ अर्थ सगळ्यांनाच माहित आहे.

भाजपनेही मास्टरस्ट्रोक मारत काँग्रेसमधून २०१२ मध्ये पक्षप्रवेश केलेल्या रितू तावडे यांना महापौर बनवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसयुक्त भाजपाचा हा प्रवास ही अचंबित करणारा आहे.

एकूणच मुंबईच्या राजकारणाची समीकरणे बदलायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचं अस्तित्व आणि महत्व हळूहळू कमी कमी होत जाईल. अधिक कमजोर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असताना एकनाथ शिंदे यांची फारशी गरज भाजपाला यापुढे राहणार नाही. हळूहळू महायुतीतील मित्रपक्षांना ही गळती लागेल. ए टीम मध्ये थेट खेळण्याची संधी असताना कोण उगीच बी आणि सी टीम मध्ये टुकू टुकू करेल. येत्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक काही नवीन नेते, काही रिलस्टार नेते आणि काही अतिजहालांचे बाप नेते जन्माला येतील. सध्या जे जहाल नेते मार्केट मध्ये आहेत, त्यांचे ही चलतीचे फार कमी दिवस राहिले आहेत.


जाता जाता एक महत्वाचा मुद्दा...

मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी हवी तशी लढत दिली नाही. काही गुप्त समझौता होता की काय अशी शंका, ठाकरे यांच्या एकूण राजकीय रणनीती बाबत मला वाटत आलीय. ठाकरेंवर सरकारमधून बाहेर पडल्यानंतर फक्त आरोप झाले, मात्र कुठलीही कारवाई झालेली नाही, ही बाब संशयास्पद आहे. लुटुपुटूची लढाई किंवा कलगीतुऱ्याचे खेळ महाराष्ट्राला नवीन नाहीत. कधीकधी राज्य पडतं, पण सरंजामदार वाचतात अशी काहीशी स्थिती राज्याच्या राजकारणात आहे.

बाकी, शिवसैनिकांना आपल्या हातातून एक आंतरराष्ट्रीय शहर गेल्याचं दुःख वा विषाद नाही.

- रवींद्र आंबेकर

Updated : 7 Feb 2026 6:57 PM IST
Next Story
Share it
Top