Home > Top News > Rashtriya Swayamsevak Sangh 100 years : शंभर पापांचा घडा भरलेला संघ

Rashtriya Swayamsevak Sangh 100 years : शंभर पापांचा घडा भरलेला संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त संघाचा इतिहास ते वर्तमान सांगताहेत लेखक डॉ. सुभाष के देसाई

Rashtriya Swayamsevak Sangh 100 years : शंभर पापांचा घडा भरलेला संघ
X

Rashtriya Swayamsevak Sangh 100 years संघ कुठला संघ ? खरंतर संघ हा शब्द बुद्ध धर्मापासून सुरू झाला संघंम शरणम् गच्छामी. Siddhartha Gautama Buddha सिद्धार्थ गौतम बुद्धांने सर्व भिक्खूंना उद्देशून एकत्र राहून स्वतःची व समाजाची उन्नती करण्यासाठी संघाची स्थापना केली त्यामध्ये परस्पराविषयी आदर प्रेम तर होताच पण नव्या विचारसरणीने समाज बांधणी होऊ लागली होती या विचारसरणीमध्ये मूर्तिपूजा स्वर्ग नरक या कल्पना यांना फाटा दिलेला होता. प्रत्यक्ष कृतीवर भर दिलेला होता काल्पनिक जगाला थारा नव्हता त्यात पुराणकथा नव्हत्या आणि काल्पनिक देव-देवताही नव्हत्या चातुर्वर्ण्य तर नव्हतेच. ज्येष्ठ कनिष्ठ भाग नव्हता. कोणी कोणावर गुलामी लागायची नव्हती आणि साऱ्यांनी मिळून religion धर्म नव्हे धम्माचा विचार अंगीकारला होता.

षड दर्शनामध्ये बुद्ध, जैन, सांख्य, चार्वाक Buddha, Jain, Samkhya, Charvaka या विचार परंपरा पुरोगामी होत्या सम्राट अशोका नंतर ही विचारसरणी जगभर पसरली. आणि नेमकी या विचाराच्या विरोधातली वैदिक परंपरा अस्वस्थ झाली त्यांना काहीही करून बुद्धाला संपवायचे होते बुद्ध धम्माला डावलायचे होते आणि म्हणून त्यांनी Vedic tradition वैदिक परंपरेतील ऋग्वेदातील चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला आणि हा स्वर्ग नरक मानणारा, मूर्तिपूजा मानणारा, काल्पनिक देव देवतांची पूजा करणारा असा प्रचार सुरू झाला. याच विचारसरणीचा आधुनिक काळामध्ये पाठपुरावा कोण करत असेल तर राष्ट्रीय सेवक संघ यामध्ये वास्तविक राष्ट्रीय काहीही नाही एका विशिष्ट जातीने साऱ्या समाजावर राज्य करण्याच्या सत्ता गाजवण्याच्या अभिप्सेतून निर्माण झालेली ही संघटना आहे.

संघ हा शब्द सुद्धा बुद्ध धम्मापासून त्यांनी चोरलेला आहे शंभर वर्षांपूर्वी या संघटनेचा जन्म झाला असला तरी त्याची पाळमूळ ऋग्वेदा मधल्या पुरुष सूक्तामध्ये आढळतात त्यामधूनच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या जाती निर्माण झाल्या आणि त्याला खतपाणी घालणारा एक गट नागपूरच्या रेशीम बागेमध्ये निर्माण झाला.

डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी Dr. Shyamaprasad Mukherjee इटलीला भेट दिल्यानंतर मुसोलिनी या फॅसिस्ट पुढार्‍याच्या विचारसरणी प्रमाणे military and religious लष्कर आणि धर्म या दोन्ही दृष्टीतून भारतावर राज्य गाजवायचे स्वप्न बाळगले हिटलर मुसोलिनी fascist leader Mussolini आणि टोजो हे त्यावेळचे फॅसिस्ट होते हाच आदर्श घेतला. आज black cap, half shorts, belt and stick काळी टोपी, हाफ चड्डी, पट्टा आणि हातात काठी हे नाझी चे अनुकरण होते आजही आहे फक्त बदल म्हणजे अलीकडे हाफ चड्डीतून फुल पॅन्ट मध्ये ही संघटना आली.

Dr. Hedgewar gave Golwalkar Guruji डॉक्टर हेडगेवार यांनी गोळवलकर गुरुजींना Nagpur नागपूरमध्ये धर्मप्रचाराचे काम दिले एकनाथ रानडेंना Christian ख्रिश्चन डॉमिनेटेड केरळमध्ये कन्याकुमारीवर विवेकानंद स्मारक उभारण्याचे काम दिले आणि आप्पासाहेब पेंडसेना पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनी हे काम सोपवले. राजे भोसले यांच्याकडून घेतलेल्या मदतीवर भोसला मिलिटरी स्कूल स्थापन केले आणि त्यातून आपल्या समाजातील तरुणांना लष्करामध्ये स्थान दिले अलीकडे भारताच्या लष्कर प्रमुख पदी असलेले नरवणे हे ज्ञान प्रबोधिनीमध्ये शिकले होते.

लष्कराच्या बाजूने देशावर या संघटनेच्या विचाराचा विजय झाला तर धार्मिक बाजूने Ram Janmabhoomi Masjid राम जन्मभूमी मशीद वादात आपल्याच विचारसरणीच्या सरन्यायाधीशाकडून देवाला कौल लावून निकाल जिंकला. राम मंदिर बांधले काशी ही हिंदूंचे धर्मस्थळ तेथेही आपल्याला हवे तसे बदल केले पण लष्कर आणि धर्म या दोन्ही फ्रंटवर या संघटनेचा दारुण पराभव झाला आहे.

धर्माला जी नैतिकतेची भक्कम पायाभरणी लागते तिच्या अभावामुळे या संघटनेचे इमले स्वप्ने, धुळीस मिळू लागली चारित्रहीनता ही जणू यातील सभासदांची खासियत आहे. Chief Minister die मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये असलेल्या भाजप नेत्याचा मृत्यू कसा झाला Pramod Mahajan प्रमोद महाजन ना गोळ्या घालण्या मागची खरी कारणे कोर्टातील चर्चा कधी बाहेर आल्या नाहीत. अटल बिहारी बाजपेयी यांच्या बद्दल Morarji मोरारजींनी इलेस्टेटेड विकली ऑफ इंडिया मध्ये सविस्तर लेख लिहिला होता आणि त्यात चारित्र्याचा उल्लेख होता Atal Bihari Vajpayee came to Kolhapur कोल्हापूरला अटल बिहारी वाजपेयी आले त्यावेळी पत्रकार परिषदेत मी त्यांना मोरारजींच्या लेखावरची प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी मौनच पाळले. मी अटल बिहारी वाजपेयी गोळवलकर गुरुजी डॉक्टर थत्ते बाळासाहेब देवरस यांना भेटलो होतो.

जेव्हा गोष्टी अंगलट येतात तेव्हा मौन पाळणे हे जणू त्यांच्या अंगवळणी पडले आहे. त्यामुळे एपस्टीनफाईलमध्ये Epstein file नावे आली म्हणून Narendra Modi will resign from the post of Prime Minister नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचा राजीनामा देतील हे संभवत नाही पण आता याच संघटनेच्या इमारतीला तडे जाऊ लागले आहे. शंकराचार्य ऋणमोक्तेश्वर नी उघड उघड प्रश्न विचारले आहेत योगी आदित्य यांनी भगव्या वस्त्रांचा त्याग तरी करावा किंवा मुख्यमंत्री पदाचा त्याग करून आखाडा प्रमुख पद कायम ठेवावे. एका बाजूला भगव्या वस्त्राचा आदर बाळगणारा हिंदू धर्म म्हणायचे आणि सर्व संघपरित्याग न करता साऱ्याचा स्वीकार करायचा हे फक्त संघाच्या हिंदू धर्मातच बसते शंकराचार्यांचा हिंदू धर्म वेगळा आणि या संघटनेचा हिंदू धर्म वेगळा त्यामुळे बहुजन समाजाने कोणत्या धर्माला आता स्वीकारायचे हा प्रश्न गंभीर बनला आहे.

सारे साधुसंत धर्म परंपरा एका बाजूला आणि RSS आरएसएसचा धर्म एका बाजूला त्यामुळे या साऱ्यापेक्षा स्वामी विवेकानंद म्हणत असे शुद्ध स्वरूपातला Hindu हिंदू धर्म म्हणजे Buddha बुद्ध धर्म त्याचा स्वीकार साऱ्या बहुजनाने करणे हा या वरचा तोडगा आहे आणि खरोखर जर असे झाले तर किती टक्के लोक आरएसएसचा हिंदू धर्म स्वीकारतील पाळतील याची शंकाच आहे. राजकारणासाठी सत्तेसाठी धर्मालाही वेठीस धरणारे आणि एकाच धर्माचं राज्य असावं असं भ्रामक स्वप्न बाळगणारे लोक आहेत शंभर वर्षे झाली तरी अजूनही त्यांची विचारसरणी डबक्यातल्या बेडकासारखी झाली आहे त्यातून त्यांनी बाहेर पडावं चातुरवर्णे सोडावं, इतर वर्णांचा द्वेष सोडावा आपणच सर्वेसर्वा आहोत हा भ्रम काढून टाकावा आणि अतिधर्मिकता सोडून वैज्ञानिक दृष्टिकोन बुद्धिवाद बाळगून समाजाच्या मूलभूत गरजा आरोग्य, शिक्षण, व्यवसाय, शेती society, health, education, business, agriculture याच्या विकासाच्या ध्यास धरावा कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जग कुठल्या पातळीवरून विचार करू लागले आहे त्याचा मागवा घ्यावा. आम्हाला कर्मकांड नको आम्हाला आमचा विकास करण्याचं मूलभूत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवं मला एकाधिकारशाही नको आहे आणि जर ती संघ आणत असेल तर प्रत्येक भारतीयांनी या विचारसरणीचा पराभवच करायला हवा कारण महाभारतातल्या शिशुपालाच्या शंभर पापांचा घडा आता भरलेला आहे श्रीकृष्णाने आता सुदर्शन चक्र सोडायची वेळ आली आहे. हा श्रीकृष्ण सुदाम्याचा साथीदार आहे सर्वसामान्य जनतेचा आधार स्तंभ आहे.


Updated : 26 Feb 2026 5:49 PM IST
author-thhumb

डॉ. सुभाष के देसाई

वयाच्या 19व्या वर्षापासून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार, लेखक, पर्यटक, गिर्यारोहक, संशोधक, धर्म आणि विज्ञान विषयातील तज्ञ अशा विविध भूमिकेतून कार्यरत असणारे डॉक्टर सुभाष के देसाई हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. गुलमोहर आर्ट गॅलरी येथे संस्थापक आहेत दैनिक सिंहवाणीचे संस्थापक संपादक, पीटीआय, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, सकाळ, पुढारी अशा विविध वृत्तपत्रात लिखाण केले अकॅडमी ऑफ रिलीज युनिटी या विविध धर्मांना एकत्र आणणाऱ्या संस्थेचे ते संस्थापक आहेत. शिवाजी विद्यापीठात वृत्तपत्र विद्या विभागात त्यांनी 25 वर्षे योगदान केलेले आहे. जवळजवळ 30 देशांमध्ये, साऱ्या हिमालयात त्यांनी भ्रमंती केली आहे. अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले जगातील आणि देशातील अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींशी त्यांचा संपर्क आला याशिवाय स्वामी विवेकानंद या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर आजन्म प्रभाव राहिला ते अविवाहित असून बहुजन हिताय बहुजन सुखाय हे त्यांनी जीवनाचे ध्येय ठेवले.


Next Story
Share it
Top