Testimonial

★★★★★

ओमकार कातुरे

Creative Head, Adbizit

पदवीधर झाल्यानंतर नोकरीच्या शोधात पाऊल टाकलं आणि आज मीडिया क्षेत्रात मला ७ वर्षांचा अनुभव आहे. या प्रवासात मी या क्षेत्रात टिकू शकलो, कारण इथे मी “न थकणारी माणसं” जवळून पाहिली. रिपब्लिक टीव्ही असो, न्युज १ इंडिया असो किंवा मॅक्स महाराष्ट्र—प्रत्येक ठिकाणी ध्येयाशी प्रामाणिक राहून काम करणारे धुरंधर पत्रकार पाहायला मिळाले. रिपब्लिक टीव्हीच्या टीमसोबत काम करताना मला टेलिव्हिजन जर्नलिझमचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. न्युज १ इंडिया येथे टेलिव्हिजन जर्नलिझमसोबतच रनडाऊन, बुलेटिनची रचना आणि बातम्यांची शिस्त समजली. तर मॅक्स महाराष्ट्रने माझ्या पत्रकारितेचा पाया अधिक भक्कम केला. माझ्या प्रवासाची खरी सुरुवात मॅक्स महाराष्ट्रपासून झाली. इथेच मी ध्येय, मेहनत, एडिटिंग, वाचन, सौंदर्यदृष्टी आणि बातमीचा अँगल यांचा खरा अर्थ समजू लागलो. इथं काम करताना अनेक न थकणारी, प्रेरणादायी माणसं पाहिली आणि त्यांच्याकडून शिकत गेलो. २६ जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान देशभरात पूर्णपणे अंमलात आले. विशेष म्हणजे ज्या मॅक्स महाराष्ट्रमधून माझ्या कामाची सुरुवात झाली, त्या मॅक्स महाराष्ट्रची सुरुवातही २६ जानेवारीलाच झाली—हा योगायोग माझ्यासाठी नेहमीच अभिमानाचा आणि प्रेरणादायी राहिला आहे. आज मी इथं जिथं पोहोचलो आहे, त्यामागे अनेकांचा हातभार आहे. पण माझ्या पत्रकारितेच्या प्रवासाची पहिली पायरी मॅक्स महाराष्ट्रने घातली—आणि त्यासाठी मी सदैव ऋणी आहे.

Read Less
★★★★★

कृष्णा कोलापटे

मॅक्स महाराष्ट्र : पत्रकारितेचा प्रवास, जनतेचा आवाज

आज मॅक्स महाराष्ट्र परिवारासोबत माझी पाच वर्षे पूर्ण झाली… आणि त्याचवेळी मॅक्स महाराष्ट्र चळवळीच्या दहाव्या वर्धापन दिनाचा हा ऐतिहासिक क्षण साजरा होतोय. या निमित्ताने मॅक्स महाराष्ट्रच्या सर्व वाचकांना, प्रेक्षकांना आणि सहकाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! मॅक्स महाराष्ट्र हे केवळ एक न्यूज पोर्टल किंवा चॅनेल नाही, तर ते पत्रकारितेचं विद्यापीठ आहे. आज समाजात कार्यरत असलेले अनेक संवेदनशील, तळागाळातील प्रश्न मांडणारे पत्रकार हे मॅक्स महाराष्ट्राच्या जडणघडणीतून घडले आहेत. आज ते विविध मेनस्ट्रीम न्यूज चॅनेल्समध्ये काम करत आहेत. जवळपास प्रत्येक मोठ्या मीडिया हाऊसमध्ये मॅक्स महाराष्ट्र परिवारातील एखादा तरी सदस्य कार्यरत आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. या पाच वर्षांच्या प्रवासात मॅक्स महाराष्ट्रचे चढ-उतार मी अगदी जवळून पाहिले आहेत. संघर्ष, अडचणी, आर्थिक मर्यादा, दबाव… पण तरीही सत्याशी तडजोड नाही हाच या चळवळीचा आत्मा आहे. अनेकदा इलेक्ट्रॉनिक मीडियाने दुर्लक्षित केलेले, बाजूला सारलेले विषय मॅक्स महाराष्ट्रने ठामपणे मांडले. कोकणातील दुर्गम भाग, दऱ्या-खोऱ्यातील धनगरवाड्या, आदिवासी पाडे, वस्त्या जिथे रस्ता, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत गरजाही पोहोचल्या नव्हत्या, तिथे जाऊन रिपोर्टिंग करण्याची संधी मॅक्स महाराष्ट्रमुळे मला मिळाली. आम्ही केलेल्या त्या रिपोर्टिंगचा प्रत्यक्ष फायदा जनतेला झाला. अनेक गावांमध्ये शासनाच्या योजना पोहोचल्या, कामे सुरू झाली. आजही त्या गावांमधील स्थानिक नागरिक फोन करून “मॅक्स महाराष्ट्रमुळे आमचा प्रश्न सुटला” असं सांगतात, तेव्हा पत्रकार म्हणून समाधान वाटतं. मॅक्स महाराष्ट्रमुळेच माझीही एक वेगळी ओळख निर्माण झाली. टीव्हीवर पाहिलेले नेते प्रत्यक्ष भेटीत संवाद साधताना, त्यांच्या मुलाखती घेताना पत्रकार म्हणून आत्मविश्वास मिळाला. भारत जोडो यात्रा असो, महापरिनिर्वाण दिन असो, दसरा मेळावा असो प्रत्येक वेळी संपूर्ण टीम मैदानात उतरून, ऊन-पावसाची तमा न बाळगता प्रामाणिकपणे काम करताना दिसते.

Read More
★★★★★

डॉ. सुभाष के देसाई, ज्येष्ठ पत्रकार

मॅक्स महाराष्ट्र न्यूज पोर्टलला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा…

२०१६ पासून दर्जेदार न्यूज पोर्टल म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. येणाऱ्या काळात पर्यावरण, नृत्य, संगीत, चित्रकला सारख्या कला व विज्ञान-तंत्रज्ञान या विषयाला थोडे स्थान दिले जावे. तत्त्वज्ञानासारख्या विषयाला प्राधान्य देण्याची गरज अशासाठी आहे की मरेपर्यंत सत्याचा आग्रह धरणारा सॉक्रेटिस, करुणा शांतीचा संदेश देणारे बुद्ध महावीर यांचे स्मरणही हवे. मानव जातीला जीवनाला त्यामुळे अर्थ प्राप्त होतो.

★★★★★

विजय गायकवाड

माजी संपादक मॅक्स किसान/span>

मॅक्स महाराष्ट्र हे माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरलं. सोळा वर्षांच्या मुंबईतील पत्रकारितेच्या प्रवासानंतर, जेव्हा २०१४ नंतरच्या बदलांमुळे पत्रकारितेचे आदर्श ढळढळीत होत होते, तेव्हा मी ठरवलं की आता कायमचा रामराम ठोकण्याआधी एकदा शेवटची खात्री करून पाहू. अनेक ठिकाणी सीव्ही पाठवले, पण उत्तरं अपेक्षितच आली – "तू सोशल मीडियावर आक्रमक आहेस", "फार अडचण आहे", "जेव्हा होईल तेव्हा सांगतो". असाच एक सीव्ही मी रवींद्र आंबेकर सरांना – मॅक्स महाराष्ट्राचे संपादक – पाठवला. फक्त एकच रिप्लाय: "येऊन भेट." मी विचारलं, "कधी?" उत्तर आलं, "माझं ऑफिस २४ तास चालू असतं, कधीही या आणि कामाला सुरुवात करा." त्या

Read More
★★★★★

संजीव चांदोरकर

अर्थतज्ञ

दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन आपण सर्वजण साजरा करत असतो.पण २०१६ सालातील प्रजासत्ताक दिन श्री रवींद्र आंबेकर यांनी खऱ्या आणि वेगळ्या अर्थाने साजरा केला, “मॅक्स महाराष्ट्र” या वेब पोर्टलची स्थापना करून.. कोणत्याही देशातील लोकशाही प्रणाली शाश्वत आणि खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक बनवण्यासाठी चौथा स्तंभ म्हणून मीडियाचे महत्त्व गेली अनेक दशके अनेकांनी अधोरेखित केले आहे..पण दुर्दैवाने जगातील सर्वात मोठ्या भारतातील लोकशाहीपासून सर्वात जुन्या अमेरिकन लोकशाहीपर्यंत, मीडियाने कणाहिनतेचे प्रदर्शन करून जनतेला धोका दिला आहे.  अशावेळी गेल्या काही वर्षात घटनात्मक मूल्यांना आणि जनतेला बांधिलकी मानून पर्यायी मीडिया प्लॅटफॉर्म उभे करण्यास अनेक तरुणांनी पुढाकार घेतला. मॅक्स महाराष्ट्र ने तर त्यात “पायोनियर”ची भूमिका वठवली आहे.  मुख्य प्रवाहातील मीडियाचे परंपरागत पोषणकर्ते असणारे शासन, कॉर्पोरेट क्षेत्र आणि जाहिरातदार, त्यांचा पर्दाफाश करू पाहणाऱ्या या पर्यायी प्रयोगांना टिकवण्यासाठी अत्यावश्यक असणारे वित्तीय स्त्रोत न पुरवणे अपेक्षित होते.  अशा आव्हानात्मक परिस्थितीत हे व्यासपीठ दहा वर्षे विविध प्रयोग, उपक्रम राबवत चालवणे सोपे नव्हते. रवींद्र आंबेकर आणि त्यांच्या जिगरबाज तरुण सहकाऱ्यांनी, वेळ पडलीच तर स्वतःच्या खिशाला खार लावून घेत, ते आव्हान पेलले आहे.  आज २६ जानेवारी २०२६ रोजी मॅक्स महाराष्ट्रला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. भारताचा आणि महाराष्ट्राचा एक कन्सर्ड नागरिक म्हणून मी मॅक्स महाराष्ट्राला धन्यवाद देखील देऊ इच्छितो.  या निमित्ताने श्री रवींद्र आंबेकर आणि सर्व टीमचे मनापासून अभिनंदन आणि भविष्यकाळातील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.

Read More
★★★★★

मॅक्स महाराष्ट्र प्रतिनिधी

मॅक्स महाराष्ट्र, प्रतिनिधी

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जाणारी प्रसार माध्यमे आज दुर्दैवाने बाजाराचा भाग न राहता स्वतःच बाजार बनली आहेत. अशा काळात सत्य, संवेदना आणि जनतेच्या प्रश्नांवर अंधाराची मळभ दाटून आली आहे. मात्र याच अंधारात मॅक्स महाराष्ट्रने आशेचा दिवा पेटवला आहे. मर्यादित संसाधने असूनही स्वतंत्र, निर्भीड आणि प्रभावी पत्रकारिता करत राहणे ही खरोखरच धाडसाची गोष्ट आहे. तत्त्वज्ञानासारख्या विषयाला प्राधान्य देण्याची गरज अशासाठी आहे की मरेपर्यंत सत्याचा आग्रह धरणारा सॉक्रेटिस, करुणा शांतीचा संदेश देणारे बुद्ध महावीर यांचे स्मरणही हवे. मानव जातीला जीवनाला त्यामुळे अर्थ प्राप्त होतो.

★★★★★

लोकचळवळीनं मॅक्स महाराष्ट्र दहा वर्षांचं झालं

आनंद गायकवाड, कार्यकारी संपादक, मॅक्स महाराष्ट्र

२६ जानेवारी २०१६ मध्ये पुरोगामी महाराष्ट्राच्या चळवळ संस्कृतीला पुढं नेणारं एक सशक्त माध्यम उभं राहिलं, त्याच नाव मॅक्स महाराष्ट्र. मुख्य प्रवाहातील माध्यमांच्या लेखी वृत्तमूल्य नाही असे विषय मॅक्सच्या प्राधान्य क्रमावर राहिले. सामाजिक जाणिवा जिवंत असलेले आणि जमिनीशी बांधिलकी असलेल्या पत्रकारांना एकत्र आणत रविंद्र आंबेकर सरांनी हा भन्नाट प्रयोग सुरु केला.

Read More
★★★★★

लीश सरदार

मॅक्समहाराष्ट्र, इंटर्न

माझं नाव लीश सरदार आहे आणि मी मॅक्स महराष्ट्र मध्ये इंटर्नशिप करते. मॅक्स महाराष्ट्र बदल सांगायचं गेलं तर, मला असा वाट की हा चॅनेल खरंच 24 तास काम करतो करण मी इलेक्शनचा वेळी आली होती आणि मी हे पाहिले की सर्वजण समर्पणाने, एकाग्रताने काम करत होते.

ऑफिस मधील स्टाफ ऑन फील्ड असो, की स्टुडिओ ला असू दे प्रत्येक व्यक्ती आपले बेस्ट देत होते. काही सहकारी तर ऑफिस मध्ये राहून काम केले ही खूपच कौतुकाची गोष्ट आहे. मी इंटर्न म्हणून, मी रील्स एडिटिंग करायला शिकली. ऑन फिल्डवर जाण्याची संधी मला मिळाली. मी यूट्यूब, फेसबूक, इंस्टाग्रामला रील्स सुद्धा अपलोड केले आणि त्याला चांगले व्ह्यूज सुद्धा आले... एकंदरीत अनुभव चांगला होतो.

Read More
Share it
Top