Home > News Update > आपत्कालीन काळात शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून काम करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आपत्कालीन काळात शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून काम करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
गेल्या दोन वर्षात पावसाची सुरूवात ही वादळांनीच झाली आहे. यंदा देखील पाऊस चांगला पडेल असा अंदाज आहे. सर्व यंत्रणांनी आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे ही चांगली गोष्ट आहे. पावसाळ्यापूर्वी प्रथमच एनडीआरएफच्या नऊ तुकड्या सात जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन कालावधीत शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. जलसंपदा विभागाने धरणसाठ्यातील पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करून संबधित अधिकाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी रहावे असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्सुनपूर्व बैठकीत दिले.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 31 May 2022 9:13 PM IST
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire