Home > News Update > शेतकरी आंदोलन: शेतकरी आणि सरकारच्या बैठकीत काय घडतंय?

शेतकरी आंदोलन: शेतकरी आणि सरकारच्या बैठकीत काय घडतंय?

शेतकरी आणि सरकार यांच्या मधील बैठकीचा पहिला टप्पा संपला, काय घडतंय बैठकीत?

शेतकरी आंदोलन: शेतकरी आणि सरकारच्या बैठकीत काय घडतंय?
X

दिल्ली च्या सिमेवर शेतकऱ्यांचं 40 दिवसांपासून थंडी, वारा आणि पावसात आंदोलन सुरू आहे. या आंदोलना संदर्भात आज सरकार आणि शेतकरी यांच्या मधील चर्चेची आठवी फेरी आज पार पडत आहे. या बैठकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. या बैठकीत ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला त्या सर्व 70 शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या श्रद्धांजली च्या वेळी शेतकरी नेत्यांनी जोपर्यत आपल्या मागण्या 100 टक्के पूर्ण होत नाहीत. तोपर्यत हे आंदोलन सुरू राहिल असा संकल्प केला.

त्यानंतर शेतकरी नेत्यांनी पुन्हा एकदा हे कायदे रद्द करण्याचा उच्चार करत बैठकीला सुरूवात झाल्याची माहिती शेतकरी नेते अभिमन्यू कोहर यांनी सांगितलं. तसंच सरकारच्या वतीनं आज सेक्शन टू सेक्शन चर्चा करण्यात यावी. असं मत व्यक्त करण्यात आल्यानंतर शेतकरी नेत्यांनी ही सर्व चर्चा अगोदर झाली आहे. सरकारने वेळ काढू पणा करू नये. असं सरकारला ठणकावून सांगितलं.

पहिल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. यावेळी सरकारच्या वतीने जी बाजू मांडण्यात आली. त्यावर शेतकरी नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सरकार निरुत्तर झाल्याचं अभिमन्यू कोहर यांनी सांगितलं आहे. दरम्यान गेल्या 30 डिसेंबरला दिल्लीतल्या विज्ञान भवनात शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये 22 दिवसानंतर चर्चा झाली होती. त्यानंतर चर्चेची ही आठवी फेरी पार पडत आहे.

या चर्चेसाठी शेतकरी संघटनांनी सरकार समोर चार पर्याय ठेवले आहेत...

कायदे रद्द करण्याची प्रकिया

सर्व शेतकऱ्यांना स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारसी प्रमाणे हमी भाव

परावली: वायू गुणवत्ता संशोधन अध्यादेशातून शेतकऱ्याला वगळावे( पाचट जाळल्या प्रकरणी दंडाची तरतूद असलेले)

विद्युत संशोधन विधेयक 2020 यामध्ये बदल

यापैकी शेवटच्या दोन विषयावर म्हणजे वायू गुणवत्ता संशोधन अध्यादेश आणि विद्युत संशोधन विधेयक 2020 याबाबतचे आक्षेप सरकारने पूर्णपणे मान्य केले. मात्र, कायदे रद्द करण्याबाबत कोणताही तोडगा निघू शकला नाही.

30 डिसेंबरच्या बैठकीत काय घडलं?

कायदे मागे घेतल्यानंतर या कायद्याला पर्याय म्हणून उपाय सुचवण्याची सूचना केंद्र सरकारने शेतकऱ्यांना केली.

एम एस पी कायदेशीर करण्यासाठी एक समिती नेमण्याचा विचार सरकार ने शेतकऱ्यांसमोर मांडला. शेतकऱ्यांनी तो नाकारला.

आजच्या बैठकीत काय?

आत्तापर्यंत शेतकरी नेते आणि सरकार यांच्या मध्ये 7 फेऱ्या पार पडल्या आहेत. या फेऱ्यांमध्ये शेतकऱ्य़ांचा प्रश्न सोडवण्यात सरकारला अपयश आलेलं आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नक्की कय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सरकारच्या वतीनं कोण करतंय चर्चा करणार?

दिल्लीतल्या विज्ञान भवनात केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात होणाऱ्या बैठकीत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पीयुष गोयल, आणि राज्य मंत्री सोम प्रकाश हे सरकारच्या वतीनं चर्चा करणार आहेत. गेल्या बैठकीत देखील हेच नेते चर्चेसाठी आले आहेत.

दरम्यान 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी दिल्लीत शेतकरी संघटनांनी सरकारला ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तसंच जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाही. तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. असं शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारला ठणकावून सांगितल्यानं सरकार आता कोणता निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Updated : 4 Jan 2021 11:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top