Home > News Update > इमानदार बोला तो बडा गुस्सा आया अंजना ओम कश्यप ला राग का आला ?

इमानदार बोला तो बडा गुस्सा आया अंजना ओम कश्यप ला राग का आला ?

इमानदार बोला तो बडा गुस्सा आया अंजना ओम कश्यप ला राग का आला ?
X

Photo courtesy : social media

उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अंजना ओम कश्यप या आज तक च्या न्यूज अँकर ला 'इमानदार' म्हटलं. अखिलेश यादव यांनी अंजना ओम कश्यप ला इमानदार म्हटल्यानंतर आनंदी होण्याएवजी अंजना ओम कश्यप अखिलेश यादव यांच्यावर उसळल्या. इमानदार म्हटल्याने अंजना यांना राग का आला याची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरू आहे.

हे ही वाचा - पाकला फटकारणाऱ्या स्नेहा दुबेंनी अंजना ओम कश्यपला दाखवला बाहेरचा रस्ता

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तारीफ, नोटबंदीचं समर्थन पासून आपल्या रोजच्या कार्यक्रमांमध्ये भाजपधार्जिणी भूमिका घेणाऱ्या अंजना ओम कश्यप सातत्याने वादाच्या भोवऱ्यात असतात. त्यांच्या पक्षपाती भूमिकेमुळे विरोधी पक्षातील नेते सातत्याने त्यांच्यावर टिका करत असतात.

हे ही वाचा - बिहारी कन्या ते देशातली सुप्रसिध्द एँकर असा आहे अंजना ओम कश्यप यांचा जीवनप्रवास!

अशातच आजतक च्या एका कार्यक्रमात अखिलेश यादव यांनी अंजना ओम कश्यप यांना वारंवार इमानदार असं म्हटलं. मी देशातील इमानदार पत्रकारांची लिस्ट केलीय त्यात तुमचं नाव ही आहे असं अखिलेश यादव ( Akhilesh Yadav ) यांनी म्हणताच अंजना ओम कश्यप उसळल्या. तुम्ही हे सारखं सारखं इमानदार म्हणून 'कटाक्ष' का करताय. असा सवाल अंजना ओम कश्यप ( Anjana Om Kashyap ) यांनी अखिलेश यादव यांना केला आहे. आजतक ( aaj tak ) एक प्रतिष्ठीत चॅनेल आहे असं ही त्या म्हणाल्या. यावर तुम्ही सारखं माझ्यावर यादव म्हणून टिका करताय असं उत्तर अखिलेश यादव यांनी दिलंय.


Updated : 11 Jan 2022 3:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top