#ठाकरे सरकार जागे व्हा - लॉकडाऊनपेक्षा हे करा !
लॉकडाऊन लावावा की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री दोन दिवसात घेणार आहेत. पण लॉकडाऊनला मोठा विरोध होतो आहे. लॉकडाऊन लावण्याआधी सरकारने सामान्यांची काय सोय केली पाहिजे यासाठी 15 पर्याय मॅक्स महाराष्ट्रने ठेवले आहेत.
X
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. पण लॉकडाऊनला राज्यभरातील सामान्य नागरिक, छोटे-मोठे उद्योजक यांनी मोठा विरोध केला आहे. पण गरज भासल्यास लॉकडाऊनच्या भूमिकेवर मुख्यमंत्री ठाम आहेत. पण लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाहीये तर सरकार या परिस्थितीत काय करु शकते याबाबत परखड भूमिका मॅक्स महाराष्ट्रने एक जबाबदार माध्यम म्हणून मांडली आहे. काही मुद्द्यांवर सरकारने तातडीने कृती केली तर बरेच प्रश्न सुटू शकतात.
मायबाप सरकार जागे व्हा
1. दारुची दुकानं बंद करु नका
कर रुपाने या व्यवसायामुळे सरकारच्या तिजोरीत मोठा महसूल येतो, त्यामुळे दारुची दुकानं बंद करु नये.
2. सर्वधर्मीय प्रार्थना स्थळं बंद करा
धार्मिक स्थळं सुरू करण्याची मागणी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. कारण अशा मागण्यांमुळे कोरोना रुग्ण वाढतातच पण धार्मिक तेढही निर्माण होते आहे.
3. पेट्रोल- डिझेलचे दर कमी करा
लॉकडाऊन केलेच तर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले पाहिजे, कारण या काळात फक्त अत्यावश्यक सेवेतील कोवीड योद्धेच ग्राहक असतात. त्यांना उलट ओळखपत्र देऊन पेट्रोल आणि डिझेलमध्ये सवलत दिली पाहिजे.
4. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थांबवा, फक्त अन्नधान्य द्या
या संकटकाळात सरकारी खर्चात कपात करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचचे पगार थांबवून त्यांना दैनंदिन जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध करुन द्या.
5.स्मारकांवरील खर्च तातडीने थांबवा
राज्य आर्थिक संकटात असताना स्मारकांवर खर्च करण्यापेक्षा तो आरोग्य व्यवस्थेवर करा.
6. शासकीय बंगल्यांवरील खर्चात 50 टक्के कपात करा
मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या शासकीय बंगल्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, त्या खर्चात 50 टक्के कपात करा.
7. नेत्यांच्या सुरक्षेवरील खर्च 50 टक्क्यांनी खर्च करा
लॉकडाऊन लावले तर मंत्री आणि नेत्यांना बाहेर पडण्याची वेळ कमी येते तसेच पडलेचच तर त्या काळात त्यांना सुरक्षेची कितपत गरज आहे, याचा विचार करुन सुरक्षेवरील खर्चात कपात करण्यात यावी.
8.कोरोना का वाढतो यावर श्वेतपत्रिका काढा
राज्यात कोरोना का काढतो याचे कोणतेही शास्त्रीय कारण सरकारने दिलेले नाही, त्यामुळे या विषयावर श्वेतपत्रिका सरकारने काढावी
9. सरकारी कार्यालयं तातडीच्या कामांसाठी सुरू करा
सरकारी कार्यालयांमध्ये कोरोनाच्या नावाखाली सामान्यांना येऊ न देता कामं रखडवली जात आहेत. त्यापेक्षा सामान्यांच्या तातडीच्या कामांसाठी सरकारी कार्यालयं सुरू करा.
10. ऑनलाईन सुनावणीसाठी घेतले जाणारी शुल्क रद्द करा
विविध शासकीय कामांसाठी ऑनलाईन सुनावणी घेतली जाते. पण त्यासाठी सामान्यांकडून पैसे घेतले जाते आहेत, ते शुल्क रद्द करा
11. जंबो कोविड सेंटर्स राजकीय कार्यकर्त्यांना देऊ नका
जंबो कोविड सेंटर सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच चालवायला देण्यात आल्याचे प्रकार काही ठिकाणी झालेत. त्यामुळे जंबो कोविड सेंटरच्या बाहेर माहितीचे डिजिटल बोर्ड लावून हे सेंटर कोण चालवतेय, त्यावरील खर्च, किती रुग्ण आहेत ही सर्व माहिती रोज अपडेट करावी.
12. जास्तीची बिलं घेणाऱ्या हॉस्पिटल्सची मान्यता रद्द करा
कोरोना रुग्णांकडून जास्तीची बिलं घेणाऱ्या हॉस्पिटल्सची मान्यता रद्द करण्यात यावी.
13. लॉकडाऊन लागणार असेल लोकांना आपापल्या गावी जाऊ द्या
लॉकडाऊन लागणारच असे तर लोकांना आपापल्या गावी सरकारने जाऊ द्यावे. गावी जाणाऱ्यांना टोल माफ केला गेला पाहिजे.
14. गावाकडे परतलेल्या गेलेल्या लोकांच्या विलगीकरणाची सोय करण्यात यावी.
15. गावी गेलेल्या मजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा






