इलेक्ट्रिक कार आणि आपला देशातील सत्य परिस्थितीचा आढावा…
इलेक्ट्रिक कार सुरु करण्याचं धोरण सरकार राबवत आहे. मात्र, हे धोरण राबवणं शक्य आहे का? मॅक्समहाराष्ट्रचे वाचक महेश आव्हाड यांनी व्यक्त केलेलं मत
X
सध्या बहुतांश देशात इलेक्ट्रिक कार्स चा क्रेझ वाढतोय. अमेरिका आणि बहुतांश युरोपियन देशांप्रमाणे भारतात सुद्धा इलेक्ट्रिक कार्सचा क्रेझ वाढतोय. पण आपल्या देशात हा प्रयोग खरंच यशस्वी होतील का? इलेक्ट्रिक कार्स घेण्याचे फायदे तर आहेच पण आपल्या देशात या कार्स ना खरंच चालना मिळेल का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो.
त्याचे कारण असे की इलेक्ट्रिक कार्स ना त्यांच्या चार्जिंग स्टेशन वर चार्ज करायला 20 ते 25 मिनिट लागतात. आणि कंपन्या ज्या आपल्याला आपल्या घरी जे चार्जिंग पॉईंट देतात त्या पॉइंट ने चार्ज व्हायला जवळपास 4 ते 6 तास लागतात. आपण जर मुंबई पुणे नाशिक या शहरांची एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेतला तर आपल्या मेट्रो शहरांमध्ये जी लोकसंख्या आहे आणि खरंच एक गाडी चार्जिंग करण्यासाठी जर 20 ते 25 मिनिट लागत असतील तर चार्जिंग पॉइंट वर गाडीच्या रांगा किती लांब वर लागतील.
सध्या आपण आपल्या कार्स मध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी रांगा पाहिल्यावंतर एक गाडीचा टॅंक फुल्ल करण्यासाठी 3 ते 5 मिनिट लागतात. तरीही कुठल्याही मेट्रो शहरांमध्ये पंपावर गाडयांच्या लांबच लांब रांगा आपल्याला दिसून येतात.
आपल्या कडे लोकांना सिग्नल सुद्धा हिरवा होई पर्यंत वाट बघण्याची फुरसत नसते. मी बहुतांश वेळेस पहिले आहे की सिग्नल वर सुद्धा शेवटचे 10 सेकंद बाकी असतात. हिरवा होण्याआधीच ही लोक सुसाट निघून जातात एवढी घाई असते. शहरांमधली सुशिक्षित लोक सुद्धा रोज किमान 10 वेळेस सुद्धा सिग्नल तोडणार. तर हे लोक खरंच तासन तास चार्जिंग पॉइंट ला वाट बघणार का.? हा फार महत्वाचा प्रश्न निर्माण होतोय. आणि एका कार्स मध्ये डिझेल किंव्हा पेट्रोल भरायला जर 5 मिनिट लागून सुद्धा अर्धा ते एक तास लोकांना रांगेमध्ये राहावे लागते तर इलेक्ट्रिक कार्स तर एका गाडी ला फुल चार्ज व्हायला 20 ते 25 मिनिट लागतात.
जर एका तासामध्ये फक्त एक इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट फक्त 3 गाडी चार्ज करू शकतो. मग एका चार्जिंग स्टेशन वर अश्या किती चार्जिंग पॉइंट त्यांना ठेवावे लागतील. आणि गाड्यांच्या रांगा किती लांबच लांब लागू शकतात. ह्याचा आपण आणि आपल्या सरकारने विचार केला आहे का.? शहरामध्ये असलेली जागेची अपुरता. गाड्यांची वाढती संख्या ह्या सर्व गोष्टी लोकांसाठी खरंच लाभदायक ठरतील का?
एक नेमकं हा ही प्रश्न निर्माण होतोय. आपल्या शहरातील लोकांकडे एवढा तासन् तास रांगे मध्ये उभे राहण्यासाठी वेळ आहे का? लोक लालबाग च्या गणपती च्या रांगेमध्ये 2 दिवस उभे राहतील पण सिग्नल आणि पंपावर नाही राहत. जरा पंपावर गर्दी दिसली की लगेच दुसरा पंप शोधायला लागतात. मग सरकार आणि जनता या परिस्थिती कडे कश्या प्रकारे बघतेय हे सर्वात महत्वाचे.
इलेक्ट्रिक कार्स हे जग भरातील प्रदूषण कमी करतील हे नक्कीच पण पब्लिक या इलेक्ट्रिक कार्स स्वीकारतील का? किंवा पुढे इलेक्ट्रिक चे रेट हे डिझेल आणि पेट्रोल प्रमाणे वाढले तर, कारण बहुतेक इलेक्ट्रिक बोर्ड हे प्रायव्हेट्स आहेत. प्रायव्हेट कंपनी आपले रेट कधी वाढावतील याचा काही नेम नसतो.
महेश आव्हाड






