Home > News Update > एकनाथ खडसे आणि त्यांचे जावई निर्दोष आहेत याची आम्हाला खात्री - मंत्री जयंत पाटील

एकनाथ खडसे आणि त्यांचे जावई निर्दोष आहेत याची आम्हाला खात्री - मंत्री जयंत पाटील

एकनाथ खडसे आणि त्यांचे जावई निर्दोष आहेत याची आम्हाला खात्री - मंत्री जयंत पाटील
X

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांचे जावई निर्दोष आहेत याची आम्हाला खात्री असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. एकनाथ खडसेंना अटक करण्याचा काही लोकांचा उद्देश दिसतो आहे. छगन भुजबळांप्रमाणे एकनाथ खडसे यांना विनाकारण गुंतवण्याचा काही लोकांचा प्रयत्न सुरू आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला देखील जयंत पाटील यांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे, 1050 कोटींच्या दलालीवर सरकार गप्प का?,190 कोटींच्या कमाईवर सरकार गप्प का?, माजी गृहमंत्री फरार, त्यावर गप्प का?,शेतकर्‍यांना मदत नाही, त्यावर गप्प का? असे अनेक मुद्दे देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान नांदेडमध्ये निवडणुका असल्याने देवेंद्र फडणवीस असे वक्तव्य करत आहेत, राज्य सरकारने आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली आहे. असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान

केंद्र सरकारने पूर आणि अतिवृष्टीची मदत, निरीक्षण करण्यासाठीची टीम ही उशिराने पाठवली असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. आज नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी मेळावा संपन्न झाला यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.सोबतच केंद्रीय तपास यंत्रणाचा भाजपकडून गैरवापर केला जात असल्याचा पाटील यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे.

Updated : 26 Oct 2021 4:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top