हिंसा समस्येचं उत्तर नाही, राहुल गांधींचं शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन…
टीम मॅक्स महाराष्ट्र | 26 Jan 2021 10:33 AM GMT
X
X
गेल्या दोन महिन्यांपासून शांततेत आंदोलन करणारे शेतकरी आज आक्रमक झाले आहेत. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली मध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. काही लोक दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या दिशेने देखील गेले आहेत. या झटापटीत काही शेतकरी आणि पोलिस जखमी झाले आहेत.
या संदर्भात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. "हिंसा कुठल्याही समस्येचं उत्तर नाही. जखम कुणालाही होवो नुकसान आपल्या देशाचचं होणार आहे. देशहितासाठी कृषीविरोधातील कायदे मागे घेण्यात यावेत." अशी मागणी करत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलं आहे.
Updated : 26 Jan 2021 10:33 AM GMT
Tags: Rahul Gandhi Farmers Protests
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire