घराला कडी-कुलूप लावून बसणाऱ्या मराठ्यांनो तुमची लाज वाटते:विनायक मेटे
मोसीन शेख | 5 Jun 2021 9:25 AM GMT
X
X
बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये विनायक मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी महा विकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ठाकरे सरकारच्या चुकीमुळेच मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आरोप मेटे यांनी केले.
काँग्रेसच्या मनात मराठा समजाबद्दल विष असून, अशोक चव्हाण यांचा जोपर्यंत राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
तसेच आज अनेक जण मराठा मोर्चात सामील झाले आहे. मात्र अनेक मराठे घराला कडी कुलूप लावून बसले असून अशांची लाज वाटते, असेही मेटे म्हणाले
Updated : 5 Jun 2021 9:25 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire