Home > News Update > सर्पदंशामुळे सात वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

सर्पदंशामुळे सात वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

पालघर जिल्ह्यातील सर्पदंश झालेल्या सात वर्षीय मुलीचा मृत्यु डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय वाचा आमचे प्रतिनिधी रविंद्र साळवे यांचा रिपोर्ट

सर्पदंशामुळे सात वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
X

पालघर : मोखाडा तालुक्यातील सायदे ग्रामपंचायत मधील बोरीचीवाडी येथील एका सात वर्षाच्या चिमुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परंतु ही घटना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे घडली असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

छाया सखाराम भोई वय 7 वर्ष दिनांक 16 तारखेला संध्याकाळी सातच्या दरम्यान अंगणासमोर चींचाच्या झाडा लगत खेळत होती .खेळत असतानाच तिथेच तिला सर्पदंश झाला. ही घटना तिच्या वडिलांना कळतात त्यांनी तात्काळ आठ वाजण्याच्या सुमारास खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार एका तासाच्या कालावधीनंतर तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या मुलीला काही झालेलं नाही. तिला सर्पदंश झालेला नाही खेळत असताना तिला दुखापत झाली असावी तिला घरी घेऊन जा असे डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांना सांगितले





यानंतर 9:30 च्या दरम्यान घरी घेऊन जात असताना तिला मोटर सायकल वरच लघुशंका होऊन तिची तब्येत खालावली नातेवाईकांनी पुन्हा तिला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. यावेळी उपस्थित डॉक्टरने तात्काळ मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिली. मोखाड्याकडे येत असताना अर्ध्या रस्त्यातच 11वाजेच्या दरम्यान सदर मुलीचा मृत्यू झाला.

माझ्या मुलीवर डॉक्टरांनी योग्य तो उपचार केला नाही .तिच्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही डॉक्टरांना सांगत होतो की तिला सर्पदंश झाला आहे. परंतु डॉक्टरांनी मनावर घेतले नाही. माझ्या मुलीच्या मृत्यूला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टरच जबाबदार आहेत असा गंभीर आरोप करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी मृत छाया चे वडील बाळू भोई यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी स्वप्नील वाघ याना संपर्क साधला असता त्यांनी कॉल उचलला नाही.

मोखाडा पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब चत्तर यांना विचारले असता ते म्हणाले की

“पेशंट खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल झाल्यानंतर काही वेळातच बीटी सिटी टेस्ट करण्यात आली परंतु रिपोर्ट नॉर्मल आल्याचे उपस्थित डॉक्टरांनी त्यांना सांगितले.

डॉक्टरांनी त्यांना कुठे जाऊ नये असे सांगितले परंतु काही वेळाने पेशंटचे नातेवाईक तिला घरी घेऊन गेले. तब्येत खालावल्यानंतर पुन्हा ते प्राथमिक आरोग्य केंद्र खोडाळा येथे आले. त्यानंतर तीला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले परंतु अर्ध्या रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला सदर घटनेची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई केली जाईल

सर्पदंश झाल्यावर पेशंटचा मृत्यू का होतो ..?

सर्पदंश झाल्यानंतर पेशंटची बिटिसिटी टेस्ट तात्काळ करणे गरजेचं आहे या टेस्ट मुळे कोणत्या सापाने दंश केला आहे हे कळते परंतु हि टेस्ट वेळेत झाली नाही तर उपचाराला विलंब होतो आणि पेशंट दगावतो .

Updated : 18 May 2023 4:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top