Home > News Update > उद्धव ठाकरेंचा बाण फडणवीसांच्या आरपार घुसला - संजय राऊत

उद्धव ठाकरेंचा बाण फडणवीसांच्या आरपार घुसला - संजय राऊत

उद्धव ठाकरेंचा बाण फडणवीसांच्या आरपार घुसला - संजय राऊत
X

मुंबई : "कलंक" या शब्दावरून राज्याच्या राजकारणात सर्वत्र चर्चा सुर आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना "नागपूरचा कलंक" म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीस चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना मानसोपचाराची गरज असल्याचं म्हटलं आहे. भाजपच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेताना ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. तर, उद्धव ठाकरे यांनी सोडलेला बाण आरपार घुसला आहे. ही तर मिरच्यांची धुरी आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खरमरीत टीका केली.

जे कालपर्यंत मुख्यमंत्री होते, बॉस होते. आज त्यांची हालत काय आहे? दोन दोन उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत काम करत आहेत. हे मुख्यमंत्री त्यांना ज्युनिअर होते, त्यांच्या हाताखाली आता हे काम करत आहेत. संपूर्ण सरकार दिल्लीतून सुरू आहे. त्यामुळे फ्रस्टेशनमध्ये फडणवीस बोलत आहेत. फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर प्रचंड खाली आणला आहे. त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. त्यांच्या काळात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला असल्याचं राऊतांनी सांगितले. त्यांच्या लोकांच्या भ्रष्टाचाराबाबत विचारल्यावर ते उत्तर देत नाहीत, अशी टीकाच राऊत यांनी केली.

झाकीर नाईक यांच्यावर टेलर फंडिंगचा आरोप आहे. त्याच्याकडून विखे पाटलांच्या खात्यात पैसे गेले त्याच्यावर काय कार्यवाही झाली. राहुल कुल यांचं काय झालं? दादा भुसे गिरणा सहकारी साखर कारखान्यासंदर्भात काय कारवाई झाली? 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा कालपर्यंत तुम्ही बोलत होतात आता राष्ट्रवादीत सोबत गेलात तर तुम्ही ढेकर दिला का? असे अनेक सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.



Updated : 12 July 2023 7:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top