लॉकडाऊनची टांगती तलवार, मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद...
टीम मॅक्स महाराष्ट्र | 21 Feb 2021 7:16 AM GMT
X
X
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील काही जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री 7 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे.
राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्यानं मुंबई सह महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? याबाबत चर्चा सुरु आहे. जुन्या क्लिप्स व्हायरल झाल्या असून या क्लिप्समुळे लोकांना पुन्हा एकदा लॉकडाऊन लागतं की काय? याची भीती सतावत आहे. एकूणच पुण्याबरोबरच मुंबईतही कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी संवाद साधणार असल्यानं आता मुख्यमंत्री कोणती घोषणा करतात? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Updated : 21 Feb 2021 7:16 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire